घरमुंबईविधानसभा निवडणूक बॅलेट पेपरवर घ्या; काँग्रेसची मुख्य निवडणूक आयुक्तांकडे मागणी

विधानसभा निवडणूक बॅलेट पेपरवर घ्या; काँग्रेसची मुख्य निवडणूक आयुक्तांकडे मागणी

Subscribe

विधानसभा निवडणुकीच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आलेल्या मुख्य निवडणूक आयुक्तांची आज महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या शिष्टमंडळाने भेट घेतली.

अवघ्या काही दिवसांवर राज्यातील विधानसभा निवडणूक असताना, आगामी विधानसभा निवडणूका ईव्हीएम ऐवजी बॅलेट पेपरवर घेण्याची मागणी काँग्रेसने मुख्य निवड निवडणूक आयुक्त सुनिल अरोरा यांच्याकडे केली आहे. या मागणीबरोबरच राज्याच्या मतदार यादीतील ४४ लाख ६१ हजार बोगस मतदारांची नावे तातडीने वगळण्याची मागणीसुद्धा काँग्रेसतर्फे करण्यात आली आहे. विधानसभा निवडणुकीच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आलेले मुख्य निवडणूक आयुक्त सुनिल अरोरा तसेच आयुक्त अशोक लवासा आणि सुशील चंद्रा यांची आज महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या शिष्टमंडळाने भेट घेतली. त्यावेळी या मागण्या करण्यात आल्या.

मतदारांची नावे वगळण्याची प्रक्रिया सुरु

यावेळी झालेल्या चर्चेत प्रदेश सरचिटणीस राजेश शर्मा यांनी निवडणूक प्रकिया मतपत्रिकेच्या माध्यमातूनच राबविण्याचा आणि मतदार यादीतील बोगस मतदार वगळण्याची मागणी लावून धरली. लोकसभा निवडणूक होण्यापूर्वी २५ फेब्रुवारी २०१९ रोजी निवडणूक आयोगाने आयोजित केलेल्या बैठकीत प्रदेश काँग्रेसने ४४ लाख ६१ हजार बोगस मतदारांची माहिती पुराव्यांसह दिली होती. मात्र अद्याप हे सगळे मतदार वगळले गेले नाहीत, अशी माहिती शर्मा यांनी आयोगाला दिली. त्यावर उत्तर देताना मुख्य निवडणूक आयुक्त सुनिल अरोरा यांनी २ लाख १६ हजार बोगस मतदारांची नावे यादीतून वगळले असून, उर्वरीत मतदारांची नावे वगळण्याची प्रक्रिया सुरु असल्याचे सांगितले.

- Advertisement -

हेही वाचा – ‘मोदींचा झगमगाट बिनकामाचा’, प्रियंका गांधींची खोचक टीका!

बहुतांश राजकीय पक्ष बॅलेट पेपरवरील निवडणुकीसाठी आग्रही

दरम्यान, यासंदर्भात प्रसारमाध्यमांकडे प्रतिक्रिया व्यक्त करताना राजेश शर्मा यांनी बोगस मतदारांची नावे वगळण्याबाबत आयोगाकडून दिरंगाई होत असल्याचे सांगितले. मुक्त व निर्भय वातावरणात निष्पक्ष निवडणूक प्रक्रिया राबविण्याकरिता बोगस मतदारांची नावे मतदारयादीतून तात्काळ वगळण्याची गरजही त्यांनी विषद केली. मतदान यंत्रांवर जनतेचा विश्वास नसल्याने आगामी विधानसभा निवडणूक मतदान पत्रिकेवर घेण्याची मागणी बहुतांश राजकीय पक्षांनी केली आहे. ही मागणी निवडणूक आयोगाने तात्काळ मान्य करावी, असा आग्रह देखील त्यांनी धरला. निवडणूक आयोगाची भेट घेणाऱ्या काँग्रेसच्या शिष्टमंडळात प्रदेश काँग्रेसच्या विधी विभागाच्या अॅड. गौरी छाब्रिया यांचा समावेश होता.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -