Goa Assembly 2022 : आमच डिपॉझिट जप्त होतय, मग का टीका का करताय ? होऊद्या प्रचार, आदित्य ठाकरेंचे भाजपला आव्हान

Goa Assembly 2022 : आमच डिपॉझिट जप्त होतय, मग का टीका का करताय ? होऊद्या प्रचार, आदित्य ठाकरेंचे भाजपला आव्हान

बाळासाहेब होते तेव्हा आम्ही भाजपसोबत युतीचा निर्णय घेतला होता. मित्र पक्ष असल्याने मित्राला धोका नको, म्हणून आम्ही इतर राज्यांमध्ये लढायचो नाही. इतर पक्ष वाढत असताना अनेक शिवसैनिक हे इतर पक्षात गेले आणि मंत्री झाले. पण त्यांच्यासोबतची मंत्री जपायला म्हणून आम्ही आतापर्यंत लढलो नाही. गेल्या ५ वर्षांमध्ये पाठीत खंजीर खुपसला,  आमच्यासोबतच एनडीएच्या पक्षांच्या पाठीतही हा खंजीर खुपसण्यात आला. त्यामुळे एनडीएतून पक्ष बाहेर पडत गेले. पण आता आमचे ज्याठिकाणी अस्तित्व होते, त्याठिकाणी आम्ही निवडणूका लढत आहोत. उत्तर प्रदेशात निवडणूक लढत आहोत, बिहारमध्ये लढतो आहोत, सिल्वासा येथे लढलो आहोत, मणीपूरमध्ये निवडणुकीला सामोरे जात आहोत. लोकसभा तसेच विधानसभेची निवडणूकही आम्ही लढतो आहोत. इथून पुढे जाताना जो काही कनेक्ट आहे, तो स्थानिक पातळीवर पुन्हा निर्माण करण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार असल्याचे आदित्य ठाकरे म्हणाले. गोव्यात विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी दाखल झालेले आदित्य ठाकरे यांनी पत्रकार परिषदेत जोरदार हल्ला केला आहे. उत्पल पर्रीकरांनाही शिवसेनेने खुला पाठिंबा दिला असल्याचे आदित्य ठाकरे म्हणाले.

भाजपला आदित्य ठाकरेंचा थेट सवाल 

भाजपला माहित आहे की आमचे डिपॉझिट जप्त होणार आहे, आमचा पक्ष इतकाच कमकुवत वाटत असेल, तर आमच्यावर टीका का करत आहात ? असाही सवाल आदित्य ठाकरेंनी विचारला. आमच्यावर बोलत तरी का आहात ? कसली भीती वाटते आहे ? होऊद्या प्रचार अशा शब्दात आदित्य ठाकरे यांनी भाजपला थेट आव्हान दिले. आम्ही मित्रत्व नेहमीच खुलेपणाने पाळले आहे. आताही मनोहर पर्रीकर यांच्या मुलाच्या विरोधात शिवसेनेने उमेदवार मागे घेतला आहे. त्यामुळे शिवसेना जे काही करते ते उघडपणाने करते असेही आदित्य ठाकरे म्हणाले.

शिवसेनेबाबत जस वातावरण बनत चालल आहे, रिपोर्ट महत्वाचे आहेत. आता निवडणूकीच्या कारणाने शिवसेनेचे चिन्ह घरोघरी पोहचत आहे. शिवसेना म्हणून गोव्यात निवडणूक लढताना गोवा आणि प्रत्येक राज्यात प्रत्येक स्तरावर निवडणूक लढणार आहोत. महाराष्ट्राच्या बाहेरही शिवसेनेची गरज निर्माण व्हायला लागली आहे. ग्रामपंचायत ते लोकसभेची निवडणूक आम्ही लढवणार आहोत, असे आदित्य ठाकरेंनी स्पष्ट केले. मुख्यमंत्र्यांचे नाव टॉप पाईव्हमध्ये येत आहे. हेच मुंबई आणि महाराष्ट्राचे मॉडेल आम्हाला देशभर न्यायचे आहे, असेही ते म्हणाले.


 

First Published on: February 12, 2022 1:19 PM
Exit mobile version