अक्षय कुमारकडून आसामच्या पूरग्रस्तांना २ कोटींची मदत

अक्षय कुमारकडून आसामच्या पूरग्रस्तांना २ कोटींची मदत

अक्षय कुमार

आसाममध्ये पुरामुळे भीषण अवस्था आहे. पुरात मोठ्या प्रमाणात गुरांढोरांचे, सामाजिक मालमत्तेचे नुकसान झाले आहे. याशिवाय अनेक लोक पुरात वाहून गेले आहेत. त्यामुळे तेथील परिस्थिती सावरणे हे आसाम सरकारच्या पुढे मोठे आव्हान आहे. दरम्यान, आसामची परिस्थिती सुधारता यावी यासाठी बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमारने चीफ मिनिस्टर रिलीफ फंड आणि काजीरंग नॅशनल पार्टसाठी प्रत्येकी १ कोटी रुपयांची मदत केली आहे. अक्षय कुमारने स्वत: याबाबत ट्विवट करुन माहिती दिली आहे.

अक्षयने मदतीचे केले आवाहान

अक्षयने याआधीही बऱ्याचदा अनेकांना मदत केली आहे. महाराष्ट्रातील भीषण दुष्काळात शेतकऱ्यांसाठी देखील त्याने १ कोटी रुपयांची मदत केली होती. याशिवाय देशाच्या सीमेवर लढणाऱ्या सैनिकांनाही त्याने यापूर्वी मदत केली आहे. शहीद जवानांच्या कुटुंबियांना देखील तो वेळोवेळी मदत करत असतो. त्याच्या या मदतीतून त्याच्यातील दानशूरपण आणि संवेदनशील मनाची जाणीव होते. अक्षयने इतरांना देखील मदतीचे आवाहन केले आहे.


हेही वाचा – डेरी अभियान अन् आमदारकीचं स्वप्न ! – भाग 2

First Published on: July 18, 2019 8:39 AM
Exit mobile version