जगात थैमान घालणाऱ्या करोनाग्रस्तांची संख्या दिवसेंदिवस वाढत असताना दिसत आहे. तसेच या करोनाचा प्रादुर्भाव अधिक वाढू नये, याकरता केंद्र सरकारने २१ दिवसांचा लॉकडाउन केला आहे. दरम्यान, ANI ने दिलेल्या वृत्तीनुसार भारतातील करोनाग्रस्तांची संख्या ८३४ वर गेली आहे. तर मृतांचा आकडा १९ वर गेला आहे. विशेष म्हणजे गेल्या २४ तासात देशभरात ९५ रुग्ण वाढले असल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे.
149 new #Coronavirus positive cases have been reported in last 24 hours, total positive cases in India now stand at 873. https://t.co/1XkxnoDWTj
— ANI (@ANI) March 28, 2020
‘करोना’ विरोधात सार्वजनिक मंडळे एकवटली
मुंबईसह राज्यात फोफावलेल्या करोनाविरोधात दोन हात करण्यासाठी सरकारनंतर आता मुंबईतील सार्वजनिक मंडळांनी देखील एकत्र येण्यास सुरुवात केली आहे.
जीवनावश्यक वस्तूंची अधिक दरांनी विक्री केल्यास होणार कारवाई
करोनाच्या पार्श्वभूमीवर सगळीकडे खबरदारी घेतली जात असून शासकीय आदेशाचे तंतोतंत पालन करणे गरजेचे आहे. नागरिकांना अत्यावश्यक सेवा देणे गरजेचे असल्याने भाजीपाला, दूध, धान्य, फळे, औषधे आदी जीवनावश्यक वस्तू देण्यासाठी प्रशासनाने शिथिलता ठेवली असून काही ठिकाणी जास्त दराने भाजीपाला किराणामाल आदी वस्तुंची विक्री केली जात असल्याच्या तक्रारी आल्या आहेत. अशा तक्रारी आढळून आल्यास त्यांच्यावर तात्काळ कारवाई केली जाईल, असे निर्देश प्रांताधिकारी अनिल पवार यांनी दिले.
एपीएमसी मार्केटमध्ये १ हजार गाड्या दाखल; नागरिकांची तुफान गर्दी
नवी मुंबईच्या एपीएमसी मार्केटमध्ये १ हजार १०० गाड्या दाखल झाल्या आहेत. त्यामुळे नागरिकांनी तुफान गर्दी केली होती. गर्दी करु नका, असे सांगून देखील त्याकडे दुर्लक्ष केल्याचे दिसून येत आहे.
पुण्यात आणखी एक करोनाचा रुग्ण आढळला
पुण्यात करोना रुग्णांच्या संख्येत वाढ झाली आहे. पुण्यात आणखी एक करोनाचा रुग्ण आढळला आहे. खासगी रुग्णालयात उपचार सुरु असणाऱ्या ५० वर्षीय रुग्णाला करोनाची लागण झाली आहे. या रुग्णाने कोणताही परदेश प्रवास केला नाही. डायबेटीस आणि फुफ्फुसाचा त्रास होत असल्याने खासगी रुग्णालयात उपचार सुरु होते.
ड्रोनच्या मदतीने शहरावर ठेवणार लक्ष
नापूरमगध्ये करोनाचा संसर्ग थांबवण्यासाठी जिल्हा प्रशासन ड्रोनच्या मदतीने शहरावर लक्ष ठेवत आहे. संचारबदीच्या काळात विनाकारण बाहेर फिरणाऱ्यांवर ड्रोनद्वारे नजर ठेवली जात आहे. तसेच गर्दीच्या ठिकाणांवरही पोलीस आणि जिल्हा प्रशासनाचे लक्ष आहे.