महाराष्ट्राच्या आकडेवारीचा विचार करता, राज्यात भाजपला १७, शिवसेनेला १७, काँग्रेसला ४, राष्ट्रवादी काँग्रेसला ९ तर इतर १ असं चित्र असण्याचा अंदाज नेल्सन सर्वेमध्ये वर्तवण्यात आला आहे.
व्हीएमआरने दिलेल्या एक्झिट पोलनुसार…
- भाजपप्रणीत एनडीएला – ३०६ जागा
- काँग्रेसप्रणीत युपीएला – १३२ जागा तर
- इतर पक्ष आणि अपक्षांना – १०४ जागा मिळतील
असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
चाणक्यने दिलेल्या एक्झिट पोलनुसार…
- भाजपप्रणीत एनडीएला – ३४० जागा
- काँग्रेसप्रणीत युपीएला – ७० जागा तर
- इतर पक्ष आणि अपक्षांना – ११३ जागा मिळतील
असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
उत्तर प्रदेशमध्ये भाजपप्रणीत एनडीएला तब्बल ५१ जागांचा फटका बसणार असल्याचा अंदाज नेल्सनच्या सर्वेमध्ये वर्तवण्यात आला असला, तरी शेजारच्या बिहारमध्ये मात्र एनडीएसाठी दिलासादायक चित्र असू शकतं. नेल्सनच्या सर्व्हेमध्ये बिहारमध्ये एनडीए – ३४ तर युपीएला ६ जागांवर विजय मिळेल, असा अंदाज वर्तवला आहे.
दरम्यान, मोदींच्या गुजरातमध्ये जनतेनं भाजपवर पूर्णपणे विश्वास दाखवला असून भाजपला २४ जागा तर काँग्रेसला फक्त २ जागांवर विजय मिळणार असल्याचा अंदाज नेल्सनने वर्तवला आहे.