Coronavirus: गोरगरीब जनतेला पुढील तीन महिने ५ किलो गहू, तांदूळ मोफत देणार

Coronavirus: गोरगरीब जनतेला पुढील तीन महिने ५ किलो गहू, तांदूळ मोफत देणार

देशात करोनाने कहर केला आहे. करोनाचा संसर्ग रोखण्यासाठी देशात लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली आहे. करोनाचा फटका अर्थकारणावर बसला आहे. लॉकडाऊनमुळे अनेकांचे हाल झाले आहेत. दरम्यान, केंद्रिय अर्थमंत्री यांनी मोठी घोषणा केली आहे. गोरगरीब जनता, कामगारांसाठी १ लाख ७० हजार करोडची घोषणा केली आहे. ८० करोड गरीबांना याचा फायदा होणार आहे. ८० करोड जनतेला ५० किलो रेशन मिळणार. पुढील तीन महिने ५ किलो गहू, तांदूळ मोफत मिळणार आहे. यासोबतच १ किलो डाळही दिली जाणार आहे. अशी घोषणा निर्मला सितारमण यांनी केली. देशातील एकही व्यक्ती उपाशी राहू नये, असे निर्मला सितारमन म्हणाल्या.

अर्थमंत्र्यांनी केलेल्या अन्य महत्त्वाच्या घोषणा

 

First Published on: March 26, 2020 1:32 PM
Exit mobile version