नायजेरियात ५ भारतीय खलाशांचे अपहरण; सुटकेसाठी प्रयत्न सुरु

नायजेरियात ५ भारतीय खलाशांचे अपहरण; सुटकेसाठी प्रयत्न सुरु

परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज

नाजेरियात समुद्री चाच्यांकडून पाच भारतीय खलाशांचे अपहर करण्यात आल्याचे वृत्त समोर आले असून याबाबतची माहिती परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी ट्विटद्वारे दिली आहे. त्याचबरोबर नायजेरीयातील भारतीय उच्चायुक्तांना या खलाशांच्या सुटकेसाठी प्रयत्न करण्याचे आदेशही त्यांनी दिली आहेत. नाजेरीयातील भारतीय राजदूत अभय ठाकूर यांना याप्रकरणी लक्ष घालण्यास सांगण्यात आले आहे. नायजेरीयन सरकारशी चर्चा करुन या पाचही जणांच्या सुटकेसाठी प्रयत्न करण्याच्या सुचनाही परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी दिल्या आहेत.

First Published on: May 7, 2019 3:49 PM
Exit mobile version