तालिबान्यांचा दहशतवाद खपवून घेतला जाणार नाही, UNSC बैठकीत भारताची भूमिका

तालिबान्यांचा दहशतवाद खपवून घेतला जाणार नाही, UNSC बैठकीत भारताची भूमिका

तालिबान्यांचा दहशतवाद खपवून घेतला जाणार नाही, UNSC बैठकीत भारताची भूमिका

अफगाणिस्तानमधील काबूलवर तालिबान्यांनी ताबा मिळवला आहे. तालिबान्यांनी काबूलवर ताबा मिळवल्यामुळे जगातील अनेक देशांमध्ये तणावाचं वातावण निर्माण झालं आहे. भारताच्या अध्यक्षतेखाली संयुक्त राष्ट्र संघाच्या सुरक्षा परिषदेची बैठक बोलवण्यात आली होती. अफगाणिस्तानमधील तालिबान्यांची दहशत खपवून घेतला जाणार नाही अशी भूमिका भारताने या युएनएससी बैठकीत मांडली आहे. तसेच अफगाणिस्तानमधील महिला आणि लहान मुलं, युवा, नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं आहे. संयुक्त राष्ट्र अफगाणिस्तानमधील नागरिकांच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहणार आहे. भारताने पहिल्यांदाच आपली भूमिका अधिकृतरित्या मांडली आहे.

संयुक्त राष्ट्रातील भारताचे राजदूत टीएस तिरुमूर्ती यांनी म्हटलं आहे की, आतंकवादी संघटनेनं शांतता दाखवावी आणि अफगाणिस्तानचा उपयोग आतंकवादी संघनेद्वारे कोणत्याही देशाला धमक्या आणि हल्ल्यासाठी वापर नाही करणार असे स्पष्ट करावे यामुळे अफगाणिस्तानच्या शेजारी असलेल्या राज्यांना याचा भरोसा होईल तसेच ते स्वतःला सुरक्षित समजतील. असे भारतीय प्रतिनिधींनी युएनच्या बैठकीत म्हटलं आहे. तसेच काबूल येथील हामिद करजई आंतरराष्ट्रीय विमान तळावर धक्कादायक दृष्ट पसरत आहेत. विमानतळावरील घटनांचे पडसाद उमटत असून लोकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं आहे. महिला, लहान मूल त्रस्त आहे. विमानतळ परिसरात होत असलेल्या गोळीबारांच्या घटना समोर येत आहेत.

अफगाणिस्तान शेजारी देश असल्यामुळे एक मित्र देश म्हणून भारतासाठी चिंतेचा विषय बनला आहे. अफगाणिस्तानमधील महिला, पुरुष आणि लहान मुल भीतीच्या वातावरणात राहत आहेत. भारताचे प्रतिनिदी तिरुमूर्ती यांनी म्हटलं आहे की, अफगाणिस्तानात संकट येण्यापुर्वीपासून ३४ शहरांत विकासकामे सुरु आहेत. यामुळे संबंधित संघटनेकडून कायदा आणि सुव्यवस्थेची आशा करत आहोत. तालिबानी संघटनेनं आपल्यापासून कोणतंही भीती नसल्याचे स्पष्ट करावे असे आवाहन भारताने केलं आहे.

महिला स्वातंत्र्य गमावतील

संयुक्त राष्ट्राच्या बैठकीत अफगाणिस्तानचे प्रतिनिधी गुलाम एम इसाकजई यांनी म्हटलं आहे की, तालिबान आपल्या आश्वासनांचे पालन करत नाही आहे. अफगाणिस्तानमधील नागरिक भीतीच्या वातावरणात जगत आहेत. तसेच मी त्या लाखो लोकांच्या वतीने बोलत आहे. अफगाणिस्तानमधील महिला, मुली आपल्या राजकीय, आर्थिक, समाजिक स्वातंत्र्य गमावणार आहेत. तालिबानने नोंदणी सुरु करण्यासाठी प्रत्येक घराची झाडाझडती घेण्यात येत आहे अशी माहिती अफगाणिस्तानच्या प्रतिनिधीनी दिली आहे.

First Published on: August 16, 2021 10:11 PM
Exit mobile version