जेएनयू घटनेच्या विरोधात गेट वे ऑफ इंडिया येथे सुरु असलेल्या आंदोलकांच्या समर्थनासाठी आमदार रोहित पवार त्याठिकामी दाखल झाले आहेत.
देशात जी अस्वस्थता आहे, तिच्यावर एकत्र येऊन विचार करायला हवा. या युवकांना आपण विश्वासात घेतलं पाहिजे. बुरखाधारी डरपोक आहेत. जर त्यांच्यात हिंमत असती, तर त्यांनी तोंडावर बुरखा नसता घातला. जे कुणी असतील, त्यांचा शोध घेऊन त्यांना कठोर शिक्षा झाली पाहिजे. मला हा हल्ला २६/११ सारखा वाटला. असे हल्ले मी महाराष्ट्रात सहन करणार नाही. या गोष्टीसाठी जे कुणी जबाबदार आहेत, त्यांना शोधून शिक्षा देणं हे पोलिसांचं कर्तव्य आहे. महाराष्ट्रात चिंता करण्याचं कारण नाही. मी तरुणांना आश्वासन देतो, की अशी कोणतीही बाब मी महाराष्ट्रात सहन करणार नाही.मला राजकारणात पडायचं नाही. बुरख्याच्या पाठी जो कुठला चेहरा आहे, तो देशासमोर यायला हवा. पोलिसांची भूमिका संशयास्पद वाटत आहे. जर पोलिसांनी कारवाई केली नाही, तर त्यांच्यावर संशय येणारच.
उद्धव ठाकरे, मुख्यमंत्री, महाराष्ट्र
मुंबईच्या गेट वे ऑफ इंडियाजवळ रविवारी रात्रीपासूनच जेएनयूमध्ये झालेल्या हल्ल्याचा निषेध करण्यासाठी तरूण जमा झाले आहेत. यावेळी गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी देखील आंदोलनात काही काळ सहभाग घेऊन आंदोलनकर्त्यांना पाठिंबा दिला…
दिल्ली महिला आयोगाची दिल्ली पोलिसांना नोटीस. जेएनयूमध्ये विद्यार्थिनींवर झालेल्या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर मागितलं स्पष्टीकरण..
Delhi Commission for Women Chief Swati Maliwal issues summons to Police over assault on female students inside the JNU campus yesterday. #JNUViolence pic.twitter.com/vbJyZLrpdJ
— ANI (@ANI) January 6, 2020
दरम्यान, जेएनयूमधल्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर अलिगढ मुस्लीम युनिव्हर्सिटीने हिवाळी सुट्ट्या वाढवण्याचा निर्णय घेतला असून टप्प्याटप्प्याने विद्यापीठ सुरू होईल, असं विद्यापीठाकडून सांगण्यात आलं आहे.
https://twitter.com/ANINewsUP/status/1214066632525410306