लग्नानंतर नवरदेवाने केला नवरीच्या घरात गृहप्रवेश!

लग्नानंतर नवरदेवाने केला नवरीच्या घरात गृहप्रवेश!

प्रातिनिधिक छायाचित्र

सध्या सगळीकडे एकाच लग्नाची चर्चा आहे. कारण या लग्नात चक्क नवरा मुलगा लग्न झाल्यावर नवरीच्या घरी गेला. हा सगळाप्रकार घडला हमरीपुरमध्ये. लग्न झाल्यानंतर मुलीच्या घरच्यांनी मुलीला सासरी घेऊन जाण्यास नकार दिला. अखेर ही गोष्ट पंचायती समोर गेली. त्यानंतर मुलीचे घरचे जोपर्यंत परवानगी देत नाहीत तोपर्यंत मुलगा मुलीच्या घरी राहील असा निर्णय घेण्यात आला.

सदर कोतवाली परिसरातील सहज-बरदाहा गावात राहणारी श्रीकांत यांची मुलगी उपासना हीचे प्रेम गेल्या सात महिन्यांपासून कोतवाली परिसरातील बारागाव येथे राहणाऱ्या संदीप याच्यावर होते. संदीपने सांगितले की,  जानेवारीपासून त्या दोघांमध्ये प्रेमसंबंध होते. मुली घरच्यांना ही गोष्ट समजताच त्यांनी पोलिस ठाण्यात मुलाविरूद्ध तक्रार केली. त्याच वेळी कारवाई टाळण्यासाठी मुलाच्या घरच्यांनी दोघांचेही लग्न लावण्याचा निर्णय घेतला. लॉकडाऊन दरम्यान शनिवारी संध्याकाळी मुख्यालयातील चौरा देवी मंदिरात दोन्ही बाजूंच्या लोकांच्या उपस्थितीत दोघांचे लग्न ही झाले.

लग्नानंतर वराच्या कुटुंबीयांनी सूनेला घेऊन जाण्यास नकार दिला. घराच्या दुरुस्तीसाठी आम्ही सुनेला घेऊन जाऊ शकत नाही असं कारण यावेळी दिलं. त्यानंतर मुलाच्या कुटुंबियांनी वेळ मागितला. शेवटी वरच्या संमतीने मुलीकडे वर तिच्याबरोबर घेऊन गेला. याविषयी बोलताना  कोतवाल एसपी पटेल म्हणाले की,  दोन्ही बाजूंनी कोणी तक्रार केल्यास त्याच आधारावर कारवाई करण्यात येईल.


हे ही वाचा – काँग्रेसला १०९ आमदारांचा पाठिंबा, राजस्थानमध्ये मध्यरात्री २.३० ला पार पडली पत्रकारपरिषद!


 

First Published on: July 13, 2020 12:03 PM
Exit mobile version