कलम ३७० हटवल्यानंतर पहिल्यांदाच पंतप्रधान नरेंद्र मोदी देशवासियांशी संवाद साधणार आहेत. त्यामुळे यावेळी ते कलम ३७०वर भूमिका मांडण्याची शक्यता आहे. याच आठवड्यात संसदेच्या दोन्ही सभागृहांमध्ये ३७० कलम हटवण्याचा प्रस्ताव बहुमताने मंजूर करण्यात आला. त्यानंतर देशभरातून यावर वेगवेगळ्या संमिश्र प्रतिक्रिया उमटू लागल्या होत्या. कलम हटवण्याच्या बाजूने अनेकजण असले, तरी विरोध करणारेही कमी नाहीत. त्यामुळेच पंतप्रधानांच्या या लाइव्हकडे साऱ्या देशाचं लक्ष लागलेलं आहे. यावेळी ऑल इंडिया रेडिओवर मोदी कलम ३७० आणि त्याला होणाऱ्या विरोधाला उत्तर देण्याची शक्यता आहे.