काँग्रेसच्या काळातील छळामुळे एका डोळ्याची दृष्टी गेली- साध्वी प्रज्ञासिंग ठाकूर

भाजपच्या भोपाळच्या खासदार साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांनी काँग्रेसच्या काळात आपला अतोनात छळ झाल्याचा  आरोप केला आहे. काँग्रेसच्या काळात त्यांना मारहाण करण्यात आली. त्यामुळे रेटीनाला इजा तर झालीच पण मेंदूलाही सूज आली होती. यामुळे एका डोळ्याची दृष्टी कायमची गेली असल्याचेही साध्वी यांनी सांगितले.

भोपाळ येथील भाजप कार्यालयात रविवारी योग दिनानिमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी साध्वी यांनी त्यांच्या अस्वास्थासाठी काँग्रेसला जबाबदार ठरवले. नऊ वर्षापर्यंत काँग्रेसच्या काळात आपला प्रचंड शारीरिक छळ करण्यात आला. यावेळी करण्यात आलेल्या मारहाणीत डोळ्यापासून मेंदूपर्यंत सूज आली अनेकवेळा या जखमामध्ये पू ही यायचा. यामुळेच आजही मला डाव्या डोळ्याने अंधुक दिसते तर उजव्या डोळ्याची दृष्टी गेल्याचा आरोप साध्वी यांनी यावेळी केला. कोरोनाच्या काळात साध्वी या त्यांच्या मतदारसंघात दिसल्या नाहीत. यामुळे भोपाळमध्ये साध्वी बेपत्ता असल्याचे पोस्टर्स अनेक ठिकाणी लावण्यात आले होते. याबद्दल बोलताना साध्वी यांनी लॉकडाऊनमुळे आपण दिल्लीहून भोपाळला येऊ शकत नव्हतो असे स्पष्ट केले. तसेच मला व माझ्या कर्मचारी व सुरक्षा रक्षकांनाही प्रवासावरील निर्बंधनांमुळे तिकीट मिळाले नाही,” असेही साध्वी यांनी सांगितले.

तर काँग्रेसने साध्वी यांचे सर्व आरोप फेटाळून लावले असून आम्ही महिलांचा आदर करतो असे म्हटले आहे.

First Published on: June 21, 2020 10:19 PM
Exit mobile version