हुंड्यासाठी मुलीला उपाशी ठेवून मारले, मरतेवेळी २० किलो झाले वजन

हुंड्यासाठी मुलीला उपाशी ठेवून मारले, मरतेवेळी २० किलो झाले वजन

(फोटो सौजन्य - द न्यूज मिनट्स)

लग्नानंतर हुंड्यासाठी अनेकदा मुलींचा छळ करण्याच्या घटना समोर येत असतात. अनेकदा मुलींना पेटवून जीवे मारण्याचा प्रयत्नही केला जातो. यासारखीच एक अमानुष घटना केरळमध्ये समोर आली आहे. तुषारा या २६ वर्षीय मुलीला भूकेमूळे मृत्यू झाला आहे. या महिलेला सासरच्यांनी उपाशी ठेवून मारहाण केल्याची माहिती समोर आली आहे. मरतेवेळी या महिलेचे वजन फक्त २० किलो क्षुल्लक राहिले होते. या मुलीचा सासरच्यांनी छळ केल्याप्रकरणी गुन्हा नोंदवण्यात आला आहे. या प्रकरणी या महिलेचा पती आणि त्याच्या आई विरोधात गुन्हा नोंदवला आहे. या दोघांना अटक केली असून त्याना न्यायालयीन कोठडीत ठेवले असल्याची माहिती केरळ पोलिसांनी दिली आहे.

काय आहे प्रकरण

तिरुवनंतपुरम मेडिकल कॉलेजमध्ये या महिलेला मृत्यूपूर्वी उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. यावेळी तिच्यावर उपचार करताना तिने सासरच्यांना यासाठी जबाबदार ठरवले. या महिलेच्या अंगावर मारहाणीचे डागही आढळून आले होते. यामुळे मृत्यूच्या वेळी या महिलेचे वजन अचानक कमी झाले होते. तसेच या महिलेला अशक्तपणा आला होता. मयत महिलेला दोन मुले आहेत. या घटनेनंतर महिलेचा पती चंटू लाल (३०) आणि त्याची आई गीथा (५५) या दोघांना पोलिसांनी अटक केली. डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार या महिलेला अशक्यपणा आल्यामुळे तिचा मृत्यू झाला होता.

First Published on: March 31, 2019 1:00 PM
Exit mobile version