आरोग्यमंत्री सचिव राजेश भूषण यांनी आज माध्यमांना माहिती दिली की, लसीसंदर्भात देशात एक तज्ज्ञांची टीम तयार करण्यात आली असून, त्यांची बैठक उद्या होणार आहे. या बैठकीत रशियाची ही लस आपल्यासाठी योग्य आहे की नाही याचा निर्णय घेतला जाणार आहे. लोकांना ही लस कशी देता येईल आणि कशाप्रकारे ती देण्यात येईल. लसीचे वितरण कसे करावे यासारख्या विषयांवर चर्चा केली जाणार आहे.
#WATCH live: Union Health Ministry briefs the media over #COVID19 situation in the country (11th August) https://t.co/VKgzZsnhLa
— ANI (@ANI) August 11, 2020
आरोग्य मंत्रालयाने म्हटले आहे की, देशात मृत्यूचे प्रमाण खूपच कमी आहे आणि ते कमी होऊन दोन टक्क्यांपेक्षा कमी झाले आहे. आता मृत्यूचे प्रमाण १.९९ टक्के आहे. मात्र पॉझिटिव्ह रूग्णांमध्ये सातत्याने वाढ होत असल्याने ते म्हणाले की, देशात दररोज सात लाखांहून अधिक चाचण्याही घेतल्या जात असल्याने कोरोनाचे रूग्ण देखील समोर येत आहे.
तसेच पंतप्रधानांनी आज म्हटले आहे की बिहार, गुजरात, उत्तर प्रदेश, बंगाल आणि तेलंगणा सारख्या राज्यात चाचणी अधिकाधिक करण्याविषयी चर्चा आहे. गेल्या काही दिवसांपेक्षा आज देशात कमी रूग्ण आढळले असून आज केवळ ५३ हजार रूग्णांची नोंद केली आहे. तर ८७१ लोकांचा मृत्यू झाला आहे. मंगळवारी देशातील कोविड -१९ रुग्णांचा आरोग्याचा दर सुमारे ७० टक्क्यांपर्यंत वाढला आहे, तर संक्रमित लोकांचा मृत्यूदर दोन टक्क्यांच्या खाली गेला आहे.
ही माहिती देताना केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने सांगितले की, प्रभावी नियंत्रण धोरण, आक्रमक व व्यापक तपासणीची यशस्वी अंमलबजावणी तसेच काळजी घेण्याच्या दृष्टिकोनावर आधारित गंभीर रूग्णांचे व्यवस्थापन यामुळे हे शक्य झाले आहे.
मंत्रालयाच्या मते राष्ट्रीय पातळीवर संक्रमित लोकांच्या पुनर्प्राप्तीचे प्रमाण ६९.८० टक्क्यांपर्यंत वाढले आहे. ते म्हणाले की, सध्या देशात संक्रमित लोकांची संख्या ६ लाख ३९ हजार ९२९ आहे जी आतापर्यंत नोंदवलेल्या एकूण रूग्णांपैकी केवळ २८.२१ टक्के आहे. हे सर्व रुग्ण सक्रिय वैद्यकीय सेवा घेत आहेत.