अभिनेत्री रुचिताने बांधली लग्नगाठ, संगीत कार्यक्रम रद्द करुन खेड्यातील लोकांना तांदूळ-डाळीचं वाटप..

अभिनेत्री रुचिताने बांधली लग्नगाठ, संगीत कार्यक्रम रद्द करुन खेड्यातील लोकांना तांदूळ-डाळीचं वाटप..

‘लव लग्न लोचा’फेम अभिनेत्री रुचिता जाधव हीने नुकताच उद्योगपती आनंद माने याच्याशी साखरपुडा केला होता. साखरपुड्याचे सुंदर फोटो सोशल मीडियावर शेअर करत रुचिताने ही माहिती तिच्या चाहत्यांना दिली होती. आता रुचिताने अखेर आनंद माने यांच्याशी लग्नगाठ बांधली आहे. ३ मे रोजी अगदी मोजक्या पाहुण्यांच्या उपस्थितीत हा विवाहसोहळा पार पडला. आपल्या भावी आयुष्याविषयी सांगताना रुचिता म्हणाली की, ‘ हा माझ्या आयूष्यातील सर्वात मोठा दिवस आहे. बंगल्यामध्ये तीन दिवस विवाह सोहळा पार पडला. पहिल्या दिवशी साखरपुडा आणि मेहंदीचा कार्यक्रम झाला. २०१३ मध्ये एक अंगठी मला खूप आवडली होती. त्याची माहिती माझ्या मैत्रिणींनी आनंदला दिली आणि त्याने अगदी तशीच अंगठी माझ्यासाठी तयार करून घेतली. ही गोष्ट माझ्यासाठी नक्कीच खास होती. खरे तर या बंगल्याच्या बाहेरच्या आवारात लग्नसोहळा होणार होता. परंतु अचानक पाऊस आल्यामुळे हा कार्यक्रम आम्हाला आतमध्ये करावा लागला.’


हे वाचा-   कंगनाची KOO एपवर एन्ट्री, म्हणाली ‘भाड्याचे घर हे भाड्याचंच असतं’…

First Published on: May 5, 2021 4:20 PM
Exit mobile version