वयाच्या ६०व्या वर्षी ‘या’ मराठी अभिनेत्रीने बांधली लग्नगाठ

वयाच्या ६०व्या वर्षी ‘या’ मराठी अभिनेत्रीने बांधली लग्नगाठ

मराठी व हिंदी चित्रपटसृष्टीत तसेच टेलिव्हिजनवरील प्रसिद्ध नाव म्हणजे सुहासिनी मुळ्ये. १९६९ पासून सुहासिनी यांनी आपल्या चित्रपटसृष्टीतील कारकिर्दीच्या प्रवासास सुरूवात केली. साधारण आतापर्यंत ५३ चित्रपटात अभिनय केला. दरम्यान २०११ साली अभिनेत्री सुहासिनी यांनी वयाच्या ६० व्यावर्षी अतुल गुर्तु यांच्याशी विवाह केला.

अभिनेत्री सुहासिनी लगान चित्रपटात आमिर खानच्या आईच्या भूमिकेत दिसल्या होत्या. वयाच्या ६० व्या वर्षी लग्न करून प्रेमाला वयाचे कोणतेही बंधन नसतं हे सिद्ध केले आहे. अतुल गुर्तु हे फिजिसिस्ट होते. या दोघांची फेसबुकच्या माध्यामातून ओळख झाली. अतुल यांच्या पहिल्या पत्नीचे कर्करोगामुळे निधन झाले. सुहासिनी यांच्याशी लग्न झाले तेव्हा ते ६५ वर्षांचे होते. हे त्यांचे दुसरे लग्न होते.

मिळालेल्या माहितीनुसार, १९९० च्या दशकात सुहासिनी रिलेशनशिपमध्ये होत्या. मात्र त्या ब्रेकअपनंतर त्यांनी पुन्हा कधीच लग्नाचा विचार केला नाही. दरम्यान, सोशल मीडियाच्या माध्यमातून अतुल यांच्याशी २०१० मध्ये ओळख झाली आणि १६ जानेवारी २०११ रोजी विवाहबंध झाले.


९३ व्या ऑस्कर पुरस्कारासाठी भारताकडून ‘जल्लीकट्टू’ चित्रपटाला नामांकन

First Published on: November 25, 2020 5:40 PM
Exit mobile version