बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूला ११ महिने उलडून गेले असले तरी चाहत्यांच्या मनात सुशांतची आठवणी आजही ताज्या आहेत. गेल्या वर्षी जून महिन्यात सुशांत सिंह राजपूतने आपल्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. त्याच्या मृत्यूला आता एक वर्ष पूर्ण होत आलं आहे. यातच नुकताच त्याचा रुममेट आणि जवळचा मित्र सिद्धार्थ पिठानीला हैदराबादमधून बेड्या ठोकण्यात आल्या. त्यामुळे सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरण पुन्हा एकदा चर्चेचा विषय ठरत आहे.
SSR Season2 coming soon ….
— Anubhav Sinha (@anubhavsinha) May 28, 2021
गेली अनेक महिने सुशांतचे कुटुंबीय, मित्र परिवार, आणि देशासह जगभरातील चाहता वर्ग त्याच्यासाठी न्याय मागत आहे. यासाठी सोशल मीडियावर सुशांत सिंह राजपूत नावाने अनेक अभियान चालवण्यात आले. अशातच दिग्दर्शक अनुभव सिन्हा यांनी सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूवर वादग्रस्त वक्तव्य केले आहे. सिंन्हा यांच्या वादग्रस्त वक्तव्यामुळे सुशांतच्या चाहत्यांकडून आणि सोशल मीडिया युजर्सकडून तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे.
अनुभव सिन्हा यांनी सुशांतच्या पहिल्या स्मृतीदिनानिमित्त इशारा करत वादग्रस्त ट्विट केले आहे. या ट्विटमध्ये त्यांनी लिहिले की, ‘SSR सीजन ३ लवकरचं येत आहे.’ या ट्विटनंतर सोशल मीडियावरील युजर्सकडून सिन्हा यांच्यावर जोरदार निशाला साधाला जात आहे. या ट्विटमुळे संपातलेल्या युजर्सला पारा भलताच चढला आहे. यावर प्रतिक्रिया देताना एक युजर्सने ट्विट केले की, ‘कुठल्याही व्यक्तीच्या मृत्यूची टिंगल करणं खूप चुकीचं आहे’.तर दुसऱ्या युजरने म्हटलं आहे ‘तुम्ही त्याच्या मृत्यूची चेष्टा करत आहात का? अशा शेकडो नाराज प्रतिक्रिया चाहत्यांकडून व्यक्त होत आहे. त्यामुळे दिग्दर्शक अनुभव सिन्हा यांचं हे ट्वीट सध्या चर्चेत आले आहे. चाहत्यांच्या मते दिग्दर्शकाने हा ट्वीट करून सुशांत सिंह राजपूतची खिल्ली उडवली आहे.