मे महिन्यात रूपेरी पडद्यावर अनुभवा पाण्याची दाहकता

मे महिन्यात रूपेरी पडद्यावर अनुभवा पाण्याची दाहकता

एक होतं पाणी

दुष्काळाची दाहकता रुपेरी पडद्यावर मांडणारा रोहन सातघरे दिग्दर्शित ‘एक होतं  पाणी’ हा  पाणी समस्येसारख्या ज्वलंत सामाजिक विषयावर  भाष्य करणारा चित्रपट येत्या १० मे पासून महाराष्ट्रात सर्वत्र  प्रदर्शित होणार आहे.

आपलं भविष्य आपल्याच हाती

एक होता राजा.. एक होती राणी. उद्या म्हणू नका ‘एक होतंपाणी’ अशी हटके टॅगलाईन  असणारा हा चित्रपट सध्या  मराठी चित्रपटसृष्टीत कौतुकाचा विषय  ठरत आहे. आशिष निनगुरकर यांनी या चित्रपटाचं लेखन केलं आहे. हा विषय समाजाच्या डोळ्यांत जळजळीत अंजन घालणारा आहे. सामाजिक बांधिलकी जपत आपलं भविष्य आपल्याच हाती आहे हा संदेश ‘एक होतं पाणी’  अधोरेखित करतो. ‘पाणी अडवा पाणी जिरवा’ची सध्या नितांत गरज असून ‘एक होतं पाणी’ म्हणण्याची वेळ येऊ  देण्यापूर्वीच त्याविषयी समाजात जागरूकता घडवून आण्यासाठी हा चित्रपट नक्कीच फायदेशीर ठरेल.

अनेक पुरस्कारांनी गौरवलेला ‘एक होतं पाणी’

अनेक चित्रपट महोत्सवांत यशस्वी  मोहोर लागवणारा ‘एक होतं पाणी’ या चित्रपटाने ‘अंबरनाथ  चित्रपट महोत्सवा’मध्ये तब्बल ६ नामांकनं पटकावलेली त्यातील २ पुरस्कारांवर म्हणजेच’ सर्वोत्कृष्ट कथा-आशिष निनगुरकर’ आणि  ‘सर्वोत्कृष्ट बाल कलाकार चैत्रा भुजबळ’ या  पुरस्कारांवर आपला ठसा उमटवला तर “नोएडा इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल” व ‘इंडियन वर्ल्ड  फिल्म फेस्टिवलमध्ये; ‘विशेषलक्षवेधी परीक्षक पसंती’ या पुरस्काराने या चित्रपटाला सन्मानित करण्यात आले.नुकत्याच झालेल्या पहिल्या अहमदनगर फिल्म फेस्टिवलमध्ये या चित्रपटाला “सर्वोत्कृष्ट सामाजिक आशय चित्रपट”,सर्वोत्कृष्ट खलनायक व सर्वोकृष्ट पोस्टर” असे पुरस्कार मिळाले.

 

First Published on: April 4, 2019 9:51 AM
Exit mobile version