‘……आणि मी आत्महत्या करण्याचा निर्णय घेतला!’

‘……आणि मी आत्महत्या करण्याचा निर्णय घेतला!’

अभिनेता मनोज बाजपेयी

संघर्षाच्या काळात मनात आत्महत्येचाही विचार आला, पण त्यावेळी मला माझ्या मित्रांनी फार साथ दिली, बिहार ते बॉलिवूड हा प्रवास माझ्यासाठी अजिबात सोपा नव्हता सांगतोय अभिनेता मनोज वाजपेयी.  अभिनेता मनोज वाजपेयीने इंडस्ट्रीमध्ये कोणत्याही गॉडफादरशिवाय स्वत:ची वेगळी ओळख निर्माण केली आहे. आपल्या प्रवासाबद्दल मनोजने एका वृत्तापत्राला दिलेल्या मुलाखतीत सांगितलं.

मुलाखतीत बोलताना मनोज म्हणाला, बिहारमधील एका गावात माझा जन्म झाला. पाच भावंडांसोबत मी लहानाचा मोठा झालो. एका झेडपीच्या शाळेत मी शिकलो. मी अमिताभ बच्चन यांचा चाहता होतो आणि मला त्यांच्यासारखं व्हायचं होतं. मी कोणत्याच कामाच्या लायकीचा नाही असं गावातले लोक म्हणायचे. पण त्याकडे मी दुर्लक्ष केलं. वयाच्या नवव्या वर्षीच मी अभिनय करण्याची स्वप्न बघितली होती. पण स्वप्न पाहण्याची माझी ऐपत नव्हती. अखेर वयाच्या १७ व्या वर्षी मी दिल्ली युनिव्हर्सिटीत दाखल झालो. तिथे मी नाटकात काम केलं आणि हे माझ्या कुटुंबीयांना माहित नव्हतं.

त्यावेळी मी आत्महत्या करणार होतो

दिल्लीच्या एनएसडीमध्ये मी प्रवेश घेण्यासाठी केलेला अर्ज तीनही वेळा नाकारला गेला. त्यावेळी आत्महत्येचा विचार माझ्या मनात आला. मी आत्महत्या करेन की काय म्हणून माझे मित्र माझ्या बाजूलाच झोपायचे. ते मला कधीच एकटं सोडत नव्हते. माझा प्रवेश होईपर्यंत त्यांनी माझी साथ दिली. त्यानंतर शेखर कपूरने मला ‘बँडिट क्वीन’मध्ये भूमिकेची ऑफर दिली. आणि मी मुंबईत राहायला आलो.”

एका वडापावसाठीही पैसे नव्हते

“सुरुवातीला मुंबईत राहणं खूप कठीण होतं. पाच मित्रांसोबत मी एका चाळीत राहायचो. कामासाठी खूप शोधाशोध केली पण ऑफरच मिळत नव्हती. एका सहाय्यक दिग्दर्शकाने तर माझा फोटो फाडून फेकून दिला होता. एका दिवसात मी तीन प्रोजेक्ट गमावले होते. इतकंच नव्हे तर पहिल्या शॉटनंतर मला साफ निघून जाण्यास सांगितलं होतं. माझा चेहरा हिरोसारखा दिसणारा नव्हता. म्हणून मोठ्या पडद्यावर मी काम करू शकेन असं त्यांना वाटत नव्हतं. कधी घराचं भाडं भरण्यासाठी पैसे नसायचे तर कधी साधा वडापाव खाण्यासाठी पैसे नसायचे. अखेर मला महेश भट्ट यांच्या टीव्ही सीरिजमध्ये काम करण्याची संधी मिळाली. त्यावेळी एका एपिसोडसाठी दीड हजार रुपये मिळायचे. माझ्या कामाचं कौतुक झालं आणि त्यानंतर मला ‘सत्या’ची ऑफर मिळाली.”

सत्याने आयुष्य बदललं

“सत्या हा चित्रपट माझा आयुष्याला कलाटणी देणारा ठरला. मला पुरस्कार मिळू लागले. तेव्हा मी माझं पहिलं घर विकत घेतलं. ६७ चित्रपटांनंतर आज मी इथे आहे. स्वप्न पूर्ण करायचंच असं ठरवलं तर त्या मार्गात येणारा संघर्ष महत्त्वाचा ठरत नाही. महत्त्वाचा ठरतो तो विश्वास.


हे ही वाचा – Video : Tiktok बंद झाल्याचे समजताच शाहरूख – काजोल ढसाढसा रडले!


 

First Published on: July 1, 2020 11:45 PM
Exit mobile version