पुन्हा हसायला तयार व्हा,कारण येतोय ‘हेरा फेरी ३’

पुन्हा हसायला तयार व्हा,कारण येतोय ‘हेरा फेरी ३’

‘हेरा फेरी’ हे नाव घेतलं की बाबूराव आपटे,राजू आणि शाम हे तीन कॅरेक्ट डोळ्यासमोर उभे राहतात. या चित्रपटातील सुनील शेट्टी, अक्षय कुमार आणि परेश रावल या तिघांनी प्रेक्षकांना पोटभरून हसायला भाग पडले. ‘हेरा फेरी’ पहिल्या भागाला प्रेक्षकांनी दिलेल्या प्रतिसादामुळे ‘फिर हेरा फेरी’ हा चित्रपटचा दुसरा प्रेक्षकांच्या भेटीला आला. आता लवकरच हेरा फेरीचा तिसरा भाग प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

‘फिर हेरी फेरी’ या चित्रपटाच्या यशानंतर हेरा फेरी ३ प्रेक्षकांच्या भेटीस येणार असल्याची चर्चा गेल्या कित्येक दिवसांपासून सुरू आहे. या चित्रपटाच्या तिसऱ्या भागात देखील सुनील शेट्टी, अक्षय कुमार आणि परेश रावल झळकणार आहेत. या चित्रपटातील अनेक संवाद तर आजही प्रेक्षकांच्या तोंडपाठ आहेत. त्यामुळे या चित्रपटाचा तिसरा भाग ही प्रेक्षक डोक्यावर घेणार यात शंकाच नाही.

काय आहे तिसऱ्या भागात

आता तिसऱ्या भागातही हीच त्रिकडी आपल्याला दिसणार आहेत. या चित्रपटाच्या कथेची केवळ वन लाईन ऐकून त्या तिघांनी या चित्रपटात काम करण्यास होकार दिला असल्याचे म्हटले जात आहे. फिर हेरा फेरी हा चित्रपट जिथे संपला, त्याच्या पुढेच हेरा फेरी 3 ची कथा सुरू होणार आहे. हेरा फेरी 3 मध्ये काही वर्षांचा लीप दाखवला जाणार असून अक्षय कुमार, सुनील शेट्टी आणि परेश रावल त्यांच्या खऱ्या आयुष्यातील वयाचीच व्यक्तिरेखा या चित्रपटात साकारणार आहेत.

दिग्दर्शक प्रियदर्शन यांनी ‘फिर हेरा फेरी’चं दिग्दर्शन नीरज व्होरा यांनी केलं होतं. तर हेरा फिर ३ चे दिग्दर्शन प्रियदर्शन करणार आहेत. प्रियदर्शन यांनीच हेरा फेरी १ च दिग्दर्शन केलं होतं. नीरज व्होरा यांचे निधन 2017 मध्ये झाले. त्याआधी नीरज हेरा फेरी 3 च्या पटकथेवर काम करत होते. त्यांनी लिहिलेल्या पटकथेचा धागा पकडूनच हेरा फेरी 3 ची पटकथा लिहिण्यात येणार असल्याचं समजतय.

First Published on: April 19, 2019 8:12 PM
Exit mobile version