का म्हणतोय रणवीर; ‘तरुणांनो लग्न करा’!

का म्हणतोय रणवीर; ‘तरुणांनो लग्न करा’!

रणवीर सिंग

बॉलीवूडचा सुपरस्टार आणि नवविवाहीत नायक रणवीर सिंग याने तरुणांना चक्क लग्न करण्याच सल्ला दिला आहे. एका वृत्तपत्राच्या सोहळ्यानिमित्त उपस्थित असलेल्या रणवीरने हे मत मांडले. गेल्याच महिन्यात रणवीरने अभिनेत्री दीपिका पदुकोणसोबत लग्नगाठ बांधली. तेव्हा स्वानुभवावरून आपण हे सांगत असल्याचे रणवीर यावेळी म्हणाला. त्यामुळे रणवीर सिंगला फॉलो करणारे चाहते त्याचा सल्ला ऐकून लग्नगाठ बांधणार का हा खरा प्रश्न आहे. दरम्यान, रणवीरने त्याचे लग्नानंतर बदललेले लाईफ यावेळी शेअर केले.

काय म्हणाला रणवीर

मी हरखून गेलो होतो. वेगळ्याच विश्वात तरळत होतो. नोव्हेंबर हा माझ्यासाठी सगळ्यात आनंदी महिना होता, डोळ्यात आनंदाश्रू होते. त्यामुळे लग्न कराच अशी शिफारस मी सर्व तरुणांना करू इच्छितो. दीपिकासोबत लगीनगाठ बांधली गेल्यानंतर मला खूप सुरक्षित असल्यासारखं वाटतंय, स्थिरस्थावर झाल्यासारखं वाटतंय. आता तिला पुढे ठेवून, तिच्या पावलावर पाऊल टाकत चालणार आहे. बायकोच्या प्रत्येक गोष्टीला हो म्हणायचं असतं, असं मी ऐकलंय. मी तसाच वागणार आहे, असे मत रणवीर सिंग यांनी मांडले आहे.

सगळ्यांनी लग्न करावं

लग्न आणि त्यानंतरची रिसेप्शन हा माझ्यासाठी सगळ्यात भारी क्षण होता. सगळ्यांसोबत सेलिब्रेट करताना मस्त वाटत होतं. त्यामुळे प्रत्येक तरुणानं आवर्जून लग्न करावं अशी मी शिफारस करतो, असं रणवीर म्हणाला.

हे वाचा –

वाचा : रणवीर राहणार दीपिकाच्या घरी

वाचा : दीपिका-रणवीर मुंबईत परतले; विमानतळावर चाहत्यांची गर्दी

वाचा : दीपिका-रणवीर wedding : पहिला फोटो व्हायरल

First Published on: December 20, 2018 2:06 PM
Exit mobile version