औरंगाबदमध्ये एका ३८ वर्षीय लष्करी जवानाने रेल्वे रुळावर उडी मारून आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. दैवत साळुंके असे या जवानाचे नाव आहे. ही घटना आज (सोमवार, दि. १९ ऑगस्ट) दुपारी एक वाजण्याच्या सुमारास घडली. दैवत साळुंके हे मुळचे सातारा जिल्ह्याचे रहिवासी आहेत. ३ वर्षांपासून ते औरंगाबाद येथे कर्तव्यावर होते. मागील काही दिवसांपासून साळुंके नैराश्यग्रस्त होते. साळुंके यांनी लष्करी गणवेशसहीत आत्महत्या केल्याचे आढळून आले.
या घटनेची माहिती मिळताच छावणी पोलीस ठाण्यातील पोलीस अधिकारी घटनास्थळी पोहोचले. तसेच लष्कारातील कर्मचारी-अधिकाऱ्यांनीही घटनास्थळी जाऊन पाहणी केली.