बीड येथे भीषण अपघात; नवरदेवाच्या भावासह ४ जण ठार

बीड येथे भीषण अपघात; नवरदेवाच्या भावासह ४ जण ठार

अपघात

नाशिक-मुंबई आग्रा महामार्गावर भीषण अपघात झाला. या अपघातामध्ये पाच जणांचा मृत्यू झाला असून २५ जण जखमी झाले आहेत. ही घटना ताजी असतानाच झाल्याची घटना ताजी असतानाच बीडजवळील राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघात झाला आहे. या अपघातामध्ये चार जणांचा मृत्यू झाला आहे.

नेमके काय घडले?

धुळे – सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर आज सकाळी भीषण अपघात झाल्याची घटना घडली. रविवारी सकाळी ९ वाजण्याच्या सुमारास बीडपासून जवळच असलेल्या पाली परिसरातील बिंदुसरा तलावानजीक हा अपघात झाला. लग्न सोहळ्यासाठी कपिलधारकडे जाणारी कार आणि उस्मानाबादकडून येणाऱ्या ट्रकची समोरासमोर धडक झाली. ही धडक इतकी भीषण होती की, अक्षरश: गाडीचा चकाचुर झाला. या अपघातामध्ये नवरदेवाच्या भावासह चार जणांचा मृत्यू झाला आहे. सकाळपासून दिवसभरातील अपघाताच्या विविध घटनांमध्ये एकूण आठ जण ठार झाले असून २५ पेक्षा अधिक जण जखमी झाले असल्याची माहिती समोर आली आहे.


हेही वाचा – नाशिक-मुंबई आग्रा महामार्गावर अपघातः ५ ठार २५ जखमी


 

First Published on: February 24, 2019 3:57 PM
Exit mobile version