NisargCyclone : अर्षद वारसी म्हणतो, ‘असा मुख्यमंत्री दुसरा कुणी नसेल’!

NisargCyclone : अर्षद वारसी म्हणतो, ‘असा मुख्यमंत्री दुसरा कुणी नसेल’!

महाराष्ट्राच्या पश्चिम किनारपट्टीवर निसर्ग चक्रीवादळ धडका देऊ लागलेलं असतानाच मुन्नाभाई फेम अभिनेता अर्षद वारसीनं एक ट्वीट करून मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचं कौतुक केलं आहे. ‘मला वाटत नाही की अशी परिस्थिती दुसऱ्या कुठल्या मुख्यमंत्र्यांवर आली असेल’, असं अर्षद वारसी म्हणाला आहे. या ट्वीटमधून अर्षदने मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्रीपदी आल्यापासून सामना केलेल्या संकटांचा उल्लेख करून त्यांचं कौतुक केलं आहे. त्यासोबतच, एवढ्याशा काळात त्यांना कोणकोणत्या संकटांचा सामना करावा लागतोय, असंही तो म्हणतोय.

काय म्हणालाय अर्षद?

या ट्वीटमध्ये अर्षद म्हणतो, ‘मला वाटत नाही दुसऱ्या कुठल्या मुख्यमंत्र्यांनी आपल्या कारकिर्दीच्या सुरुवातीच्याच टप्प्यामध्ये इतकी सारी आव्हानं पाहिली असतील. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे मुख्यमंत्रीपदी बसलेच होते, तितक्यात त्यांना एका जागतिक महामारीने राज्यासमोर उभ्या केलेल्या संकटाचा सामना करावा लागला. मुंबईसारख्या गर्दीच्या शहराला या संकटापासून वाचवण्याचं काम करावं लागलं. आणि कोरोनाचं संकट अजूनही असताना आता निसर्ग चक्रीवादळाचं आव्हान त्यांच्यासमोर उभं ठाकलं आहे’.

महाराष्ट्राच्या पश्चिम किनारपट्टीवर निसर्ग चक्रीवादळाचा तडाखा बसला असून कोकण किनारपट्टीपासून थेट मुंबईपर्यंत या वादळाचा प्रभाव पाहायला मिळत आहे. या भागामध्ये वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस पाहायला मिळत आहे.

First Published on: June 3, 2020 12:55 PM
Exit mobile version