सैन्य भरतीचे स्वप्न अपुर्ण; व्यायामास जाताना वाहन धडकेत तिघांचा मृत्यू

सैन्य भरतीचे स्वप्न अपुर्ण; व्यायामास जाताना वाहन धडकेत तिघांचा मृत्यू

प्रातिनिधिक फोटो

बीड जिल्ह्यात असणाऱ्या गेवराई तालुक्यातील तळेवाडी गावात आज धक्कादायक घटना घडली आहे. ही घटना आज शनिवारी घडली. पहाटेच्या वेळी व्यायामाकरिता जाण्यास निघालेल्या तीन तरूणांना एका वेगवान कारने चिरडल्याने तिघेही जागेच ठार झाले आहे. सकाळी पहाटे साधारण पाच वाजेच्या सुमारास कल्याण- विशाखापट्टणम या महामार्गावर व्यायामाकरिता गेले असताना हा अपघात झाला.

अशी घडली घटना

अपघाती मृत्यू झालेल्या तिघांनाही सैन्यात भरती होऊन देशसेवा करण्याची इच्छा होती. पण त्यापुर्वीच काळाने अघात केला. सैन्यात भरती होण्याचे स्वप्न उराशी घेऊन निघालेल्या या महामार्गावर गढीकडून माजलगावकडे वेगवान जाणाऱ्या वाहनाने पाठीमागून जोरात धडक दिली. या धडकेत तिघांचाही मृत्यू झाला.

अपघातात ठार झालेल्या विद्यार्थ्यांची नावं

गढी येथील जय भवानी हायस्कूलमध्ये शिक्षण घेणाऱ्या निल प्रकाश थोटे (वय १४), तुकाराम विठ्ठल यमगर (१६) व अभिषेक भगवान जाधव (१४) या तिघांचा अपघाती मृत्यू झाला. या तिघांच्या मृत्यूनंतर तळेवाडी गावावर दुःखाचा डोंगर पसरला आहे. ही घटना समजताच गेवराई पोलिसांनी घटनास्थळी दाखल होऊन अधिक तपास सुरू केला.

First Published on: July 20, 2019 2:45 PM
Exit mobile version