Coronavirus Maharashtra: आज सर्वाधिक ३२५४ रुग्णांची नोंद; १४९ रुग्णांचा मृत्यू

Coronavirus Maharashtra: आज सर्वाधिक ३२५४ रुग्णांची नोंद; १४९ रुग्णांचा मृत्यू

महाराष्ट्राची आजची आकडेवारी

राज्यातील शिथिल करण्यात आलेले लॉकडाऊन आणि त्याचवेळी कोरोनाबाधितांची लाखाच्या दिशेने होत असलेली कूच राज्यासाठी घातक ठरण्याची शक्यता आहे. मागील काही दिवसांपासून मोठ्या प्रमाणात रुग्ण सापडत असताना बुधवारी आतापर्यंतचे सर्वाधिक ३२५४ कोरोना रुग्ण सापडले. राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या ९४ हजार ४१ झाली आहे. तसेच १४९ रुग्णाचा मृत्यू झाल्याने मृतांची संख्या ३४३८ इतकी झाली आहे. बुधवारी १८७९ रुग्ण बरे होऊन घरी पाठवण्यात आल्याने आजपर्यंत एकूण ४४ हजार ५१७ करोना बाधित रुग्ण बरे झाले असून राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ४७.३४ टक्के एवढे आहे.

राज्यात १४९ करोना बाधित रुग्णांच्या मृत्यू झाला असून त्यामध्ये मुंबई ९७, ठाणे १५, नवी मुंबई ५, उल्हासनगर ३, वसई विरार २, जळगाव ५, पुणे १०, औरंगाबाद ७, बीड १, अकोला २, अमरावती १, गडचिरोली १ असे आहेत. मृत्यूंपैकी ९४ पुरुष तर ५५ महिला आहेत. आज नोंद झालेल्या १४९ मृत्यूपैकी ६० वर्षे किंवा त्यावरील ८७ रुग्ण आहेत तर ४९ रुग्ण हे वय वर्षे ४० ते ५९ या वयोगटातील आहेत. तर १३ जण ४० वर्षांखालील आहे. या १४९ रुग्णांपैकी १०४ जणांमध्ये ( ७० %) मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयरोग, अशा स्वरुपाचे अतिजोखमीचे आजार आढळले आहेत. मृत्यूपैकी ६६ मृत्यू हे मागील दोन दिवसांतील आहेत तर उर्वरित मृत्यू १८ एप्रिल ते ६ जून या कालावधीतील आहेत. या कालावधीतील ८३ मृत्यूंपैकी मुंबई ५८, ठाणे ९, नवी मुंबई ५, जळगाव ४,उल्हास नगर ३, वसई विरार २,अमरावती १ आणि गडचिरोली १ असे आहेत.

आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या ५,९३,७८४ नमुन्यांपैकी ९४,०४१ नमुने पॉझिटिव्ह (१५.८३ टक्के ) आले आहेत. राज्यात सध्या कंटेनमेंट ३८९७झोन क्रियाशील असून आज एकूण १८,३८४ सर्वेक्षण पथकांनी काम केले असून त्यांनी ६७.६५ लाख लोकसंख्येचे सर्वेक्षण केलेले आहे. सध्या राज्यात ५,६९,१४५ लोक होम क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात संस्थात्मक क्वारंटाईन सुविधांमध्ये ७५,७२७ खाटा उपलब्ध असून सध्या २७,२२८ लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

First Published on: June 10, 2020 8:37 PM
Exit mobile version