आज राज्यात ७२९ नवीन रुग्णांची नोंद झाली. यामुळे राज्यातील करोना बाधित रुग्णांची संख्या ९३१८ झाली आहे. तर ३१ करोना बाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आज झालेल्या मृत्यूपैकी मुंबईचे २५, जळगाव येथील ४ तर पुणे शहरातील २ आहेत. मुंबई शहरात आज नमूद केलेले मृत्यू हे दिनांक २० ते २८ एप्रिल २०२० या कालावधीतील आहेत. तसेच जळगाव येथील मृत्यू हे मागील चार दिवसातील आहेत. यासोबतच आज १०६ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. आजपर्यंत एकूण १३८८ करोना बाधित रुग्ण झाले आहेत.
मृत्यूंबद्दल अधिकची माहिती
आज झालेल्या मृत्यूंपैकी १६ पुरुष तर १५ महिला आहेत. आज झालेल्या ३१ मृत्यूपैकी ६० वर्षे किंवा त्यावरील २० रुग्ण आहेत तर १० रुग्ण हे वय वर्षे ४० ते ५९ या वयोगटातील आहेत तर १ रुग्ण ४० वर्षांखालील आहे. या ३१ रुग्णांपैकी २० जणांमध्ये (६५%) मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयरोग, अशा स्वरुपाचे अतिजोखमीचे आजार आढळले आहेत. कोविड १९ मुळे राज्यात झालेल्या मृत्यूंची संख्या आता ४०० झाली आहे.