तौत्के चक्रीवादळाचा महाराष्ट्राती पाच जिल्ह्यांना मोठा फटका बसला आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस दोन दिवसीय कौकण दौऱ्यावर असून यामध्ये रायगड आणि कोकणातील जिल्ह्यांचा नुकसानग्रस्त भागाचा आढावा घेणार आहेत. ‘निसर्ग चक्रीवादळ आले होते. त्यावेळी राज्य सरकारने काही घोषणा केल्या होत्या. त्या घोषणांची अद्याप पूर्तता झालेली नाही. तसेच नुकसान भरपाई देखील मिळालेली नाही. त्यावेळेसही प्रचंड प्रमाणात नुकसान झाले होते. अशावेळी लोकांना मदतीची अपेक्षा होती. पण ती काही मिळालेली नाही. आता पुन्हा एकदा लोकांना दुसरा फटका बसला आहे. त्यामुळे आता सरकारने भरघोस मदत करणे गरजेचे आहे’, अशी प्रतिक्रिया विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. फडणवीस रायगडमधील दौऱ्यावर असून त्यांनी नुकसान झालेल्या भागाची पाहणी केली आहे.