मुख्यमंत्र्यापेक्षा जास्त देशहित शरद पवारांना कळतं – नवाब मलिक

मुख्यमंत्र्यापेक्षा जास्त देशहित शरद पवारांना कळतं – नवाब मलिक

राष्‍ट्रवादी काँग्रेसचे राष्‍ट्रीय प्रवक्‍ते नवाब मलिक

“मुख्यमंत्री शरद पवारांच्या वक्तव्यावर गैरसमज निर्माण करत आहेत. त्यांना ते वक्तव्यच कळले नाही. मुख्यमंत्र्यापेक्षा जास्त देशहित शरद पवारांना कळते”, असा जबरदस्त टोला राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि मुंबई अध्यक्ष नवाब मलिक यांनी मुख्यमंत्र्यांना लगावला आहे. शरद पवार म्हणाले होते की, पाकिस्तानातील राज्यकर्ते आणि सैन्यदलातील लोक स्वतःच्या हितासाठी आणि राजकीय फायद्यासाठी भारताच्या विरोधात वातावरण निर्माण करत आहेत, असा आरोपही नवाब मलिक यांनी केला.

बीसीसीआयचे अध्यक्ष असताना शरद पवार भारतीय क्रिकेट संघासोबत पाकिस्तानला गेले होते. तिथली सर्वसामान्य जनता भारताशी वैर वैगरे बाळगून नाही, असे पवारांच्या निदर्शनास आले. उलट तिथले नागरीक पाहुण्यांची चांगली खातिरदारी करतात, असा अनुभव आल्याचा किस्सा पवारांनी सांगितला होता. परंतु याच वक्तव्याचा विपर्यास करून मुख्यमंत्री दिशाभूल करत आहेत. पाकिस्तानचे हित आम्ही जोपासत नाही तर भाजपच पाकिस्तानचे हित जोपासत आहे, असा आरोप नवाब मलिक यांनी केला.

देशातील शेतकर्‍यांच्या कांदयाला भाव मिळत असताना एमएमटीसीच्या माध्यमातून पाकिस्तानातून कांदा आयात करणाऱ्या भाजप सरकारने देशहित आम्हाला शिकवण्याचा प्रयत्न करु नये, असा टोलाही नवाब मलिक यांनी लगावला

First Published on: September 16, 2019 5:14 PM
Exit mobile version