गणेशोत्‍सव मंडळाना मुख्यमंत्र्यांकडून दिलासा

गणेशोत्‍सव मंडळाना मुख्यमंत्र्यांकडून दिलासा

गणेशोत्‍सव मंडळांना मंडपाच्‍या परवानगींचे अर्ज करण्यासाठी २ सप्टेंबर ही मुदत देण्यात आली होती. मात्र या मुदतीमध्ये वाढ करण्यात आली आहे. आता मंडपाच्या परवानगीकरता गणेशोत्‍सव मंडळांना ५ सप्टेंबर ही वाढीव मुदत वाढ देण्यात आली. मुंबई भाजपा अध्‍यक्ष आमदार अॅड आशिष शेलार यांच्‍या पुढाकाराने गुरुवारी घेण्यात आलेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. यामुळे आता गणेशोत्‍सव मंडळांना मुख्यमंत्र्यांकडून दिलासा मिळाला आहे.

गणेशोत्‍सव मंडळांना दिलासा देणारे निर्णय

या बैठकीत महासंघाचे पदाधिकारी, समन्‍वय समिती आणि आमदार अॅड. आशिष शेलार यांनी केलेल्‍या मागण्‍यांनुसार अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत.

First Published on: August 30, 2018 6:51 PM
Exit mobile version