मुस्लिम व्यक्तीकडे शस्त्र सापडली तर तो दहशतवादी ठरला असता – प्रकाश आंबेडकर

मुस्लिम व्यक्तीकडे शस्त्र सापडली तर तो दहशतवादी ठरला असता – प्रकाश आंबेडकर

प्रकाश आंबेडकरांची भाजपवर टीका

काही दिवसांपूर्वी डोंबिवलीत आरएसएस, भाजपा कार्यकर्त्याकडे हत्यारे सापडली. ही हत्यारे कशासाठी होती? दंगल घडवण्यासाठी होती का?, हत्यारांची गरज काय? हे आरएसएस आणि भाजपाने सांगावे, असा सवाल बहुजन आघाडीचे अध्यक्ष डॉ.प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे. आरएसएस सुरक्षित आहे, मग हत्यारे कशासाठी असा देखील प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे. एखाद्या मुस्लिम व्यक्तीकडे हत्यारे मिळाली असती तर त्याला दहशदवादी म्हणून घोषित केले असते, असं प्रकाश आंबेडकर यांनी सांगितले आहे. पिंपरी-चिंचवडमध्ये वंचित बहुजन आघाडी मेळाव्यातील जाहीर सभेत ते बोलत होते. यावेळी अनेक कार्यकर्ते आणि नेते उपस्थित होते.

जागा वाटपावर समझोता करू

‘आरएसएसच्या कार्यकर्त्याकडे हत्यारे मिळाली, तर ते दहशतवादी आहेत असं का म्हणू नये?’, असं देखील प्रकाश आंबेडकर यांनी म्हटले आहे. ‘सनातनच्या इथे बॉम्ब मिळाले, मात्र यावर कोणी बोलायला तयार नाही. याठिकाणी दोन मापदंड आहेत. हे समांतर सरकार आहे. या समांतर सरकाच्या विरोधात काँग्रेसने पाऊल उचलली नाहीत. काँग्रेसने आजपर्यंत आरएसएसला संविधान चॅलेंज करण्याची संधी दिली. या आरएसएस चौकटीत कसं आणायचा याचा आराखडा द्या. त्यानंतर जागा वाटपावर समझोता करू. परंतू यावर काँग्रेस बोलायला तयार नाही ते एमआयएमच्या पाठीमागे लपले आहे’, अशी टीका देखील त्यांनी केली आहे. देशातील खरा प्रश्न म्हणजे दोन वेगवेगळे प्रशासन चालतात. एक संविधानाच्या अंतर्गत राष्ट्रपती आणि त्याला समांतर शासन मोहन भागवत चालवतात, असं प्रकाश आंबेडकर यांनी म्हटले आहे.

भाजपला सुरक्षा दिली पाहिजे – इम्तियाज जलील

प्रियांका गांधीमध्ये इंदिरा गांधी दिसतात तर प्रकाश आंबेडकर यांच्यात डॉ. बाबासाहेब दिसत नाहीत का? असं आमदार इम्तियाज जलील यांनी विचारले. केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांच्या वक्तव्यावर बोलताना ते म्हणाले की, पोलिसांनी भाजपाला सुरक्षा दिली पाहिजे कारण जनतेचे काही खर नाही.

हेही वाचा – 

तेरी भी चूप, मेरी भी चूप – प्रकाश आंबेडकर

First Published on: January 29, 2019 4:21 PM
Exit mobile version