ईराणहून आणण्यात आलेले २७५ भारतीय नागरिक जोधपूरला दाखल झाले आहेत. त्यांना आर्मी वेलनेस सेंटरमध्ये ठेवलं जाणार आहे. या आधी ईराणहून भारतात २७७ नागरिकांना आणण्यात आले होते.
राज्यात आज कोरोनाबाधित २८ नवीन रुग्णांची नोंद . त्यामुळे राज्यातील रुग्णांची एकूण संख्या १८१ झाली आहे. या नवीन रुग्णांमध्ये सर्वाधिक २२ रुग्ण मुंबईचे आहेत तर २ रुग्ण नागपूर येथील आहेत. इतर ४ रुग्ण पालघर – वसई विरार आणि नवी मुंबई परिसरातील आहेत.
पुण्यात आणखी तीन रूग्णांची दुसरी करोना चाचणी निगेटीव्ह. आज डिश्चार्ज मिळण्याची शक्यता