पुणे: मोदींना एवढं सिरियसली घ्यायची गरजच नाही. ज्या मोदींनी निवडणूक आयोग आणि आणखी काही घटनात्मक संस्था आपल्या पायाखाली घेतल्या आहेत आणि त्या माध्यमातून शिवसेना-फडणवीस गट स्थापन केला आणि आम्हाला नकली बोलतात. 4 जूननंतर याचं उत्तर त्यांना जनता देईलच. पण आम्हीही 4 जूनला याचं उत्तर देणार आहोत. तेव्हा मोदींनी हा प्रश्न आम्हाला विचारावा, तोही कोल्हापुरात येऊनच, असं थेट आव्हान ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी पंतप्रधान मोदी यांना दिलं आहे. राऊतांनी पुण्यात पत्रकार परिषद घेतली, यावेळी त्यांनी हे वक्तव्य केलं आहे. (Lok Sabha Election 2024 Don t take Narendra Modi too seriously Sanjay Raut open challenge to PM Modi on Election result )