पालघर साधू हत्याकांडप्रकरणी ४९५५ पानांच आरोपपत्र दाखल!

पालघर साधू हत्याकांडप्रकरणी ४९५५ पानांच आरोपपत्र दाखल!

हत्या करण्यात आलेले साधू

दोन महिन्यांपूर्वी पालघरमध्ये दोन साधूंसह तिघांची जमावाने संशयातून निर्घृण मारहाण करत हत्या केली होती. या घटनेमुळे संपूर्ण महाराष्ट्रासह देशभरात निषेधाच्या प्रतिक्रिया उमटू लागल्या होत्या. या घटनेत दोन साधू आणि एका चालकाच्या हत्येप्रकरणी सीआयडीकडून कोर्टात ४९५५ पानांचं आरोपपत्र दाखल करण्यात आलं आहे. या प्रकरणात तब्बल १५४ आरोपींना अटक करण्यात आली होती. यात ११ अल्पवयीन तरूणांचा समावेश आहे. तसंच पाच पोलिसांना निलंबित करण्यात आलं असून ३० हून अधिक बदल्या करण्यात आल्या आहेत.

पालघरमधील घटनेनंतर सर्व स्तरातून राज्यभर संताप व्यक्त केला. राज्यसरकारवर मोठ्या प्रमाणावर टीका होऊ लागली. यानंतर या प्रकरणाचा तपास सीआयडीकडे सोपवण्यात आला होता. सीयआडीकडून एएनआयला देण्यात आलेल्या माहितीनुसार, “पोलीस उपअधीक्षक आणि तपास अधिकारी विजय पवार यांनी डहाणू कोर्टात १२६ आरोपींविरोधात ४९५५ पानांचं आरोपपत्र दाखल केलं आहे”.

सीआयडीकडून चौकशी सुरू

सीआयडीकडून आरोपींविरोधात पुरावे गोळा करण्यासाठी ८०८ संशयितांची चौकशी करण्यात आली. १०८ साक्षीदारांचे जबाब नोंदवण्यात आले. कोणत्याही आरोपीला जामीनावर सोडण्यात आलेलं नाही अशी माहिती सीआयडीने दिली आहे.


हे ही वाचा – मेळघाटातून जाणारा रेल्वेचा मार्ग बदला, मुख्यमंत्र्यांचे केंद्राला पत्र!


First Published on: July 16, 2020 10:31 AM
Exit mobile version