शेतकऱ्यांचा लाँग मार्च थांबवण्यासाठी गिरीश महाजन नाशिकला रवाना

शेतकऱ्यांचा लाँग मार्च थांबवण्यासाठी गिरीश महाजन नाशिकला रवाना

हतबल शेतकऱ्यांना विधानभवनवर येण्यास पोलिसांचा मज्जाव

शेतकऱ्यांकडून पुन्हा एकदा नाशिक ते मुंबई असा लाँग मार्च काढण्यात आला आहे. हा लाँग मार्च आजपासून सुरु झाला आहे आणि २७ फेब्रुवारीला विधानसभेवर धडकणार आहे. सरकारने दिलेल्या आश्वासनांची पूर्तता न केल्यामुळे शेतकऱ्यांनी पुन्हा एकदा लाँग मार्च काढला आहे. दरम्यान, या लाँग मार्चला थांबवण्यासाठी राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन मुंबईहून नाशिकला रवाना झाले आहेत. शेतकऱ्यांची समजूत घालवण्यासाठी ते नाशिकला निघाले आहेत. गेल्यावर्षीदेखील गिरीश महाजन यांनी मध्यस्ती करत शेतकऱ्यांची समजूत घातली होती. परंतु, सरकारकडून आश्वासनांची पूर्तता न झाल्यामुळे शेतकऱ्यांनी पुन्हा लाँग मार्च काढला आहे.

हतबल शेतकऱ्यांना विधानभवनवर येण्यास पोलिसांचा मज्जाव

गेल्यावर्षी शेतकऱ्यांनी आपल्या विविध मागण्यांसाठी नाशिक ते मुंबई असा लाँग मार्च काढला होता. त्यावेळी सरकारने त्यांच्या मागण्या मान्य करण्याचे आश्वासन दिले होते. परंतु, या आश्वासनांची पूर्तता अध्यापही न झाल्यामुळे नैराश्यात गेलेल्या शेतकऱ्यांनी पुन्हा एकदा लाँग मार्च काढण्याचे ठरवले आहे. हा लाँग मार्च आजपासून सुरु होणार आहे. यामध्ये ४० हजार शेतकरी सहभागी होणार असून २७ फेब्रुवारीला विधानसभेवर धडणार आहे. परंतु, पोलिसांनी या लाँग मार्चची परवानगी नाकारली आहे. पोलिसांनी मुंबई-नाका येथे धरणे-आंदोलन करायला परवानगी दिली आहे. परंतु, कोणत्याही परिस्थितीत हा लाँग मार्च निघणारच असा पवित्रा किसान महासभेने घेतला आहे. पोलीस स्थानबद्द करतील या भीतीने किसान सभेचे प्रमुख नेते भूमिगत झाले आहेत. ऐन वेळी गनिमी काव्याने मुंबई नाका परिसरात येण्याचा या नेत्यांचा प्रयत्न असणार आहे.

काय आहेत किसान मोर्चाच्या मागण्या

‘सरकारच्या दडपशाहीच्या मोहिमेचा तीव्र निषेध!’

डॉ. अजित नवले यांच्याविरुद्ध सरकार आणि पोलिसांनी गेले सात दिवस उगारलेल्या दडपशाहीच्या हत्याराचा अखिल भारतीय किसान सभा जळजळीत निषेध करीत आहे. तसेच आज सकाळपासून ठाणे-पालघर जिल्ह्यातून नाशिकला येणाऱ्या हजारों शेतकऱ्यांना पोलिसांनी जव्हार, डहाणू, कासा, धुंदलवादी, विक्रमगड अशा ठिकाणी अडवले. दोन तास लोकांनी खूप संघर्ष केल्यावर आता हळूहळू काही वाहनांना पोलिसांना सोडावे लागले. अहमदनगर जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांनाही पोलीस गेले काही दिवस प्रचंड त्रास देत आहेत. या दडपशाही बद्दलही सरकार आणि पोलिसांचा अखिल भारतीय किसान सभेतर्फे तीव्र निषेध! अशा भ्याड पावलांमधून शेतकऱ्यांच्या लॉंग मार्च मुळे भाजप-प्रणित राज्य सरकारचे धाबे किती दणाणले आहे हेच देशाच्या जनतेसमोर स्पष्ट झाले आहे.
– डॉ. अशोक ढवळे, अध्यक्ष, अखिल भारतीय किसान सभा
First Published on: February 20, 2019 1:34 PM
Exit mobile version