सिन्नरला भीषण अपघातात ३ ठार

सिन्नरला भीषण अपघातात ३ ठार

सिन्नर तालुक्यातील केदारपूर शिवारात इंडिगो कार व डंपर यांच्यात रविवारी (दि.१३) झालेल्या भीषण अपघातात कोपरगाव येथील चालक आणि माय-लेकासह तीन जण जागीच ठार झाले.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सकाळी ९ वाजेच्या सुमारास सिन्नर-शिर्डी रोडवर केदारपूर शिवारात बॉम्बे ढाब्यासमोर हा अपघात झाला. कोपरगावकडून येणारी इंडिगो कार (एमएच-१२, सीके-९०३०), डंपर (एमएच-१७, बीडी-७५५५) यांच्यात हा अपघात झाला. यात इंडिगो कारचालक रवींद्र गंगाधर रावळ (वय ४२, रा. लक्ष्मीनगर, कोपरगाव) यांच्यासह कारच्या मागील सीटवर बसलेले भागेश अनंत जोशी (वय ५०) व त्यांची आई लिलावती अनंत जोशी (वय ७५, दोघेही रा. कामगार वसाहत, कोळपेवाडी साखर कारखाना) हे तिघेही जागीच ठार झाले. अपघाताची माहिती मिळताच एमआयडीसी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरिक्षक दशरथ चौधरी यांच्यासह पोलीस पथक घटनास्थळी दाखल झाले. अपघातानंतर डंपरचालक ज्ञानेश्वर बुरंगुले (रा. मिरगाव, सिन्नर) हा फरार झाला असून, त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक तुषार गरुड करत आहेत.

First Published on: June 13, 2021 8:31 PM
Exit mobile version