अंबडच्या प्रकल्पग्रस्त शेतकर्‍यांची भर पावसात मुंबईकडे कूच; २० वर्षापासून प्रलंबित मागण्यांसाठी पायी मोर्चा

अंबडच्या प्रकल्पग्रस्त शेतकर्‍यांची भर पावसात मुंबईकडे कूच; २० वर्षापासून प्रलंबित मागण्यांसाठी पायी मोर्चा

नाशिक : अंबड औद्योगिक वसाहती मध्ये एस.टी.पी. प्लांटला तातडीने मंजूरी द्यावी व प्लांट उभा करावा तसेच गेल्या वीस वर्षांपासून दुर्लक्षित राहिलेल्या अंबड व सातपूर येथील प्रकल्पग्रस्त शेतकर्‍यांच्या समस्या सोडवण्याच्या मागणीसाठी अंबड नाशिक येथुन मंत्रालय, मुंबई येथे पायी मोर्चा निघाला असुन मुंबई येथे मुख्यमंत्री एकनाथ शिदे तसेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन देणार असल्याची माहिती अंबड सातपुर प्रकल्पग्रस्त संघर्ष समितीचे अध्यक्ष साहेबराव दातीर यांनी दिली. मोर्चात अंबड व सातपूर येथील दोनशेहून अधिक प्रकल्पग्रस्त शेतकरी सहभागी झाले आहेत.

प्रकल्पगस्त शेतकर्‍यांच्या मागण्यासाठी मुंबई मंत्रालय येथे मोर्चा काढण्या पूर्वी अंबड येथील ग्रामदैवत मारुती मंदिर येथे ग्रामस्थांच्या उपस्थितीत मारुतीचे दर्शन घेऊन मोर्चाला सुरुवात करण्यात आली. अंबड सातपुर प्रकल्पग्रस्त संघर्ष समितीचे अध्यक्ष साहेबराव दातीर समवेत बंडोपंत दातीर, शांताराम फडोळ, माजी नगरसेवक राकेश दोंदे, रामदास दातीर, शरद फडोळ, महेश दातीर, गोकुळ दातीर, त्र्यंबक मोरे, अविनाश फडोळ, शरद कर्डिले, पांडुरंग दोंदे यांच्यासह दोनशे शेतकरी अंबड एक्सलो पॉईन्ट गरवारे चौक मार्गे मुंबई कडे पायी मोर्चाने रवाना झाले आहेत.

या आहेत मागण्या

पायी मोर्चा मुंबई मंत्रालय येथे पोहोचल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन देणार येणार आहे. : साहेबराव दातीर, अध्यक्ष, प्रकल्पग्रस्त संघर्ष समिती

First Published on: June 27, 2023 6:48 PM
Exit mobile version