मुंबई नाका पोलीस ठाण्याजवळ असलेल्या सोसायटीच्या बंद पडलेल्या गाळ्यांमध्ये मानवी अवयव सापडल्याने एकच खळबळ आहे. वेगवेगळ्या बॉटलमध्ये केमिकल प्रक्रिया करून मानवी डोके, हात, कान असे वेगवेगळे मानवी अवयव आढळून आले आहेत. शिवाय, बादलीमध्ये केमिकल प्रक्रिया करून मानवी अवशेष ठेवल्याचे समोर आले आहे. घटनास्थळी आठ कानसुद्धा आढळून आले आहेत. पोलीस चौकशीत दुकानमालकाने पंधरा वर्षापासून गाळे उघडले नाही याबद्दल मला काहीच माहित नाही असा खुलासा केला आहे. घटनास्थळी वरिष्ठ पोलिसांसह मुंबई नाका पोलिसांचे पथक दाखल झाले आहे.