एकलहरे : त्र्यंबकेश्वरला उगम पावणार्या गोदावरी नदीचं महात्म्य सर्वपरिचित आहे. म्हणूनच गोदावरीला अतिशय पवित्र मानलं जातं. मात्र, याच नदीची नाशिकमध्ये मात्र प्रचंड दूरवस्था झाल्याचं चित्र कायम आहे. नाशिक शहरात प्रदूषण नियंत्रणासाठी थोडेफार प्रयत्न होत असले तरीही, शहराच्या बाहेर पडताना गोदापात्रात प्रचंड फेस तयार झाला असल्याचं चित्र आहे. यावरुन महापालिकेचे प्रयत्न कसे फोल ठरताहेत हे दिसतंय.
बर्फाचा भास
एकलहरे बंधार्यात पाण्याला उग्र दर्प येतो आणि याच ठिकाणी फेसामुळे संपूर्ण पात्रात बर्फ पडला की काय असा भास होतो. गेल्या काही वर्षांपासून हे दुर्दैवी चित्र कायम असतानाही संबंधित यंत्रणा मात्र गप्प आहेत.