महामार्ग दुरुस्त करा, अन्यथा घोटी टोल बंद करू

महामार्ग दुरुस्त करा, अन्यथा घोटी टोल बंद करू

मुंबई-नाशिक महामार्गाची अत्यंत दयनीय अवस्था झाली असून हायवे महामार्गावर ठिकठिकाणी खड्यांचे साम्राज्य पसरले आहे. या महामार्गावर लहान मोठ्या गाड्यांचे मोठ्या प्रमाणात अपघात देखील झाले आहे. यामध्ये काही प्रवाशांनी आपले प्राण गमावले आहे तर काहींना कायमचे अपंगत्व आले आहे. रस्ता त्वरीत दुरुस्त करावा या मागणीसाठी आज नाशिक जिल्हा महाराष्ट्र नवनिर्माण सेना आक्रमक झाली असून मनसेचे प्रदेश उपाध्यक्ष अ‍ॅड. रतनकुमार इचम, जिल्हाध्यक्ष दिलीप दातीर व उपजिल्हाध्यक्ष संदीप किर्वे यांच्या नेतृत्वाखाली टोल व्यवस्थापनाला निवेदन देत चार दिवसांचा अल्टीमेटम दिला आहे.

जिल्ह्याचे व मुंबईचे प्रवेशद्वार असलेल्या इगतपुरी तालुक्यात घोटी टोल नाक्यावर टोल वसुली मात्र जोमात सुरू असुन रस्ते मात्र कोमात गेले आहेत. तरीही टोल व्यवस्थापन सस्ता दुरुस्तीकडे लक्ष देत नसल्याच्या पार्श्वभूमीवर मनसे आक्रमक होत टोल प्रशासनाला वेठीस धरत चार दिवसांत महामार्ग दुरुस्त नाही केला तर टोलनाका बंद करण्याचा इशारा दिला आहे. यावेळी टोलनाका व्यवस्थापनाच्या वतीने मनसेचे निवेदन घेत लवकरच रस्ता दुरुस्त करण्याचे आश्वासन दिले आहे. यावेळी मनसेचे प्रदेश सरचिटणीस अँड. रतनकुमार इचम, जिल्हाध्यक्ष दिलीप दातीर, उपजिल्हाध्यक्ष संदीप किर्वे यांच्यासह तालुकाध्यक्ष मूळचंद भगत, तालुका उपाध्यक्ष भोलेनाथ चव्हाण, माजी सरपंच कैलास भगत, विद्यार्थी सेना जिल्हाध्यक्ष श्याम गोहाड, प्रताप जाखेरे, गणेश उगले, निलेश जोशी, पूनम राखेचा, संतोष बिन्नर आदी पदाधिकारी उपस्थित होते.

First Published on: August 25, 2021 9:20 AM
Exit mobile version