केशरी शिधापत्रिकाधारकांनाही मिळणार सवलतीत धान्य

केशरी शिधापत्रिकाधारकांनाही मिळणार सवलतीत धान्य

भिवंडीत धान्याचा काळाबाजार; नऊ टन रेशनिंगचे तांदूळ ताब्यात

कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर संपुर्ण राज्यात प्रतिबंधात्मक उपाययोजना करतानाच राज्य सरकारने अन्नधान्य मोफत वाटण्याचा महत्वाचा निर्णय घेतला आहे. मागच्या लॅाकडाऊनच्या काळात राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेअंतर्गत तसेच शेतकरी योजनेअंतर्गत सामाविष्ट न झालेल्या केशरी शिधापत्रिकाधारकांना सवलतीच्या दराने अन्नधान्याचा लाभ देण्यात आला होता. या योजनेअंतर्गत जुनमध्ये अन्नधान्य वितरण करण्याचा निर्णय सरकारने घेतला असल्याची माहिती राज्याचे अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी दिली आहे.

यावेळी माहिती देताना भुजबळ म्हणाले की, राज्यात प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेअंतर्गत अन्नधान्यांचे राज्यात मोफत वितरण चालू आहे,त्याचबरोबर आता केशरी शिधापत्रिकाधारकांनाही जुन महिन्यात प्रतिव्यक्ती १ किलो गहू व १ किलो तांदूळ याप्रमाणे २ किलो अन्नधान्य सवलतीच्या दरात वाटप करण्याचा महत्वाचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. या निर्णयाचा राज्यातील ७१ लाख ५४ हजार ७३८ एपीएल केशरी शिधापत्रिकाधारकांना लाभ होणार असल्याचे भुजबळ यांनी म्हटले आहे.

जिल्हयात १२ लाख शिधापत्रिकाधारक
जिल्हयात १२ लाख २८ हजार ३२९ केशरी शिधापत्रिकाधारक कुटूंब असून यात ५८ लाख ७८ हजार ४९७ लाभार्थी आहेत. या लाभार्थ्यांना या योजनेंतर्गत जून महिन्यात सवलतीच्या दरात धान्य वाटप करण्यात येणार असून पुरवठा विभागाकडून त्याचे नियोजन करण्यात येत असल्याचे जिल्हा पुरवठा अधिकारी अरविंद नरसीकर यांनी सांगितले.

First Published on: May 26, 2021 8:29 PM
Exit mobile version