रत्नागिरीत दोन भीषण अपघात; ५ जण ठार तर २९ जखमी

रत्नागिरीत दोन भीषण अपघात; ५ जण ठार तर २९ जखमी

रत्नागिरी एसटीबसला अपघात

रत्नागिरीमध्ये दोन भीषण अपघाताच्या घटना घडल्या आहेत. पहिला अपघात नायरी निवळी घाटात झाला आहे. एसटीबस पलटी होऊन झालेल्या या भीषण अपघातामध्ये २६ प्रवासी जखमी झाले आहेत. तर जखमींमधील एका महिलेची प्रकृती गंभीर आहे. स्थानिकांनी प्रवाशांना घाटातून बाहेर काढून रुग्णालयात दाखल केले. तर दुसरी अपघाताची घटना दापोली – खेड मार्गावर घडली आहे. डंपर आणि मॅक्झिमोमध्ये भीषण अपघात झाला आहे. या अपघातामध्ये ५ जणांचा जागीच मृत्यू झाला आहे तर तीन जण गंभीर जखमी झाले आहेत. मृतांमध्ये दोन महिला आणि तीन पुरुषांचा समावेश आहे. जखमींना नजीकच्या रुग्णालयात उपचारासाठी हलवण्यात आले आहे. नारगोली इंद्रधनु बागेजवळ ही अपघाताची घटना घडली आहे. मॅक्झिमो गाडी ओव्हरटेक करत असताना डंपरला जाऊन धडकली. या अपघातानंतर रत्नागिरी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असून या अपघाताचा तपास सुरु आहे.

 

First Published on: December 28, 2018 10:14 AM
Exit mobile version