आमदारांवर दहशत ठेवण्यासह खुनी हल्ले झाले, संजय राऊत यांचा दावा

आमदारांवर दहशत ठेवण्यासह खुनी हल्ले झाले, संजय राऊत यांचा दावा

शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी एकनाथ शिंदे यांच्यासोबत असलेल्या आमदारांबाबत मोठा दावा केला आहे. अनेक आमदारांनी तिथून सुटण्याचा प्रयत्न केला, त्यांच्यावर दहशत आणि खुनी हल्ले झाल्याची माहिती आम्हाला मिळते आहे. काही आमदारांनी कळवले आहे की आमच्या जिवाला धोका आहे. येथे आमची हत्याही होऊ शकते, असा मोठा दावा संजय राऊत यांनी केला आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत शिवसेनेच्या मुंबईत असलेल्या आमदारांची बैठक पार पडली. त्यानंतर माध्यमांशी बोलताना संजय राऊत यांनी गंभीर आरोप केला आहे. गुजरात पोलिसांच्या केंद्रीय पोलिसांच्या गराड्यात त्यांना ठेवण्यात आले आहे. अनेक आमदारांनी तिथून सुटण्याचा प्रयत्न केला, त्यांच्यावर दहशत आणि खुनी हल्ले झाल्याची माहिती आम्हाला मिळत आहे. काही आमदारांनी कळवले आहे की आमच्या जिवाला धोका आहे. येथे आमची हत्याही होऊ शकते. अशाप्रकारचे वातावरण का तयार केले जात आहे. मला माहिती नाही. पण यातूनही शिवसेना बाहेर पडले. शिवसेनेचे संघटन यातून पुन्हा एकदा उभे राहिल. कुणी कितीही म्हणत असले तरी संघटनेला कुठेही तडा गेलेला नाही. संध्याकाळी पुन्हा बैठक आहे. अनेक आमदारांनी आमच्याशी विविध मार्गांनी संपर्क साधला, असा दावा संजय राऊत यांनी केला आहे.

9 आमदारांच्या कुटुंबियांची तक्रार –

इतकेच नाही तर अनेक आमदारांच्या कुटुंबियांनी तक्रार केली आहे. अकोल्याचे आमदार नितीन देशमुख यांच्या तत्नीने तक्रार केली आहे.त्यांचे अपहरण करुन त्यांना सूरतला नेण्यात आले आहे आणि त्यांच्या जिवाला धोका आहे. आतापर्यंत अशा 9 आमदारांच्या कुटुंबियांनी तक्रारी केलेल्या आहेत. हे असेच चालू राहिले तर मुंबई पोलिसांना याबाबत कठोर अॅक्शन घ्यावी लागेल हे सगळ्यांना माहिती आहे, असा इशरा संजय राऊत यांनी भाजपला दिला आहे.

First Published on: June 21, 2022 5:09 PM
Exit mobile version