घरात घुसण्याचा प्रयत्न कराल तर शिवसैनिक मरायला अन् मारायला तयार – संजय राऊत

घरात घुसण्याचा प्रयत्न कराल तर शिवसैनिक मरायला अन् मारायला तयार – संजय राऊत

ज्या भाजपसोबत तुम्ही आता आहात त्यांचं पहिलं सरकार आणण्यासाठीही समाजवादीनेच पाठिंबा दिला होता, त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी आधी अभ्यास करावा, मग बोलावं, असा सल्लाही राऊतांनी यावेळी दिला.

आमच्य घरात घुसण्याचा प्रयत्न कराल तर शिवसैनिक शांत बसणार नाही. शिवसैनिक मारायला आणि मरायलासुद्धा तयार आहे. असे वक्तव्य शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केलं आहे. मातोश्रीवर हनुमान चालिसा पठण करणार असल्याचा इशारा खासदर नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांनी दिला आहे. राणा दाम्पत्याला रोखण्यासाठी शिवसैनिक रस्त्यावर उतरले असून आक्रमक भूमिका घेतली आहे. शिवसैनिकांनी मुंबईतील खार या राणा दाम्पत्याच्या घरासमोर आणि मातोश्रीबाहेर गर्दी केली आहे.

मातोश्रीबाहेर तसेच रवी राणा यांच्या खारमधील घराबाहेर शेकडो शिवसैनिकांनी गर्दी केली आहे. शिवसैनिकांनी राणा दाम्पत्याविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. परंतु राज्याती कायदा आणि सुव्यवस्था बिघडली तर त्याला राणा दाम्पत्य जबाबदार असेल असे वक्तव्य राज्याच्या गृहमंत्र्यांनी केलं आहे. तर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी राणा दाम्पत्यावर हल्लाबोल केला आहे.

आमच्या घरात घुसण्याचा प्रयत्न कराल तर याद राखा, शिवसैनिक स्वतःच रक्षण करण्यासाठी समर्थ आहेत. तसेच शिवसैनिक मारायला आणि मरायला तयार आहेत. फक्त आमच सरकार असल्यामुळे पोलिसांचे संरक्षण घेतलं जात आहे. राज्यातील कायदा आणि सुव्यवस्थेच्या गोष्टी आम्हाला सांगू नका, मुख्यमंत्र्यांनी काय करावे असे सल्ले ऐकण्याइतके भिकारीपण महाराष्ट्राला आले नाही असे वक्तव्य संजय राऊत यांनी केलं आहे.

राष्ट्रपती राजवटीच्या धमक्या देऊ नका – राऊत

तुम्ही कोण आहात, काय लायकी तुमची आहे? आम्हाला धमक्या देऊ नका आम्ही तुमच्या धमक्यांना घाबरत नाही. ईडी, सीबीआय लावा, याक्षणी शिवसैनिकांवर कोणाचा कंट्रोल नाही आहे. हा रोष शिवसैनिकांच्या मनातील आहे. राष्ट्रपती राजवट लागू करण्याच्या धमक्या आम्हाला देऊ नका, आम्ही सत्तेसाठी जन्माला आलो नाही तर सत्ता आमच्यासाठी जन्माला आली आणि हे बाळासाहेबांचा वाक्य आहे, असे संजय राऊत म्हणाले.

बायकांच्या मागून वार करणं बंद करा

बायकांच्या पाठीमागून वार करणं बंद करा, आम्हाला पुरुन उरायला भाजपला सात जन्म घ्यावे लागतील. केरळ, पश्चिम बंगालमधील लोकं भाजपला पुरुन उरले आहेत. राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था बिघडवण्याचा प्रयत्न भाजपच्या लोकांकडून सुरु आहे. हा सगळा प्रकार भाजपने बंद करावा असा इशारा संजय राऊत यांनी दिला आहे.


हेही वाचा : कायदा व सुव्यवस्था बिघडल्यास राणा दाम्पत्य जबाबदार, गृहमंत्री वळसे पाटलांचा स्पष्ट इशारा

First Published on: April 23, 2022 11:44 AM
Exit mobile version