गोदावरीत कार बुडून दोन तरुणांचा मृत्यू

गोदावरीत कार बुडून दोन तरुणांचा मृत्यू

भरधाव कारवर नियंत्रण मिळवता न आल्याने कार गोदावरी नदीत पडली. कारमधून बाहेर येता न आल्याने दोन जणांचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना समोर आली आहे. ही घटना काल, शुक्रवारी मध्यरात्री आसारामबापू पुलाजवळ घडली. याप्रकरणी गंगापूर पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे. कारचालक कल्पेश प्रभाकर मेश्राम (वय २८) आणि भूषण मुरलीधर तिजारे (वय २८) अशी मृतांची नावे आहेत.

पोलिसांच्या माहितीनुसार, कल्पेश मेश्राम व भूषण तिजारे हे शुक्रवारी मध्यरात्री दीड वाजेदरम्यान आसारामबापू पुलाजवळ आले. त्यावेळी मेश्राम हे भरधाव वेगाने कार (एमएच ४३-एल-४१३९) चालवत होते. कारवर त्यांना नियंत्रण मिळवता न आल्याने कार नदीत आली. कार पाण्यात बुडाल्याने व दोघांना बाहेर वेळीच न आता आल्याने त्यांचा मृत्यू झाला. याप्रकरणी गंगापूर पोलिसांनी माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. कार पाण्यातून बाहेर काढत दोघांना पोलिसांनी रात्री जिल्हा रुग्णालयात आणत पंचनामा व वैद्यकीय अधिकार्‍यांनी शवविच्छेदन केले.

हेही वाचा –

‘हा तर बाळासाहेबांचे फोटो वापरून वाढलेला पक्ष’; राऊत पुन्हा भाजपवर बरसले

First Published on: December 14, 2019 1:49 PM
Exit mobile version