शिवसेनेवर टीका करण्यासाठी राणेंचे बुजगावणे पुढे केलं, विनायक राऊतांची भाजपवर टीका

शिवसेनेवर टीका करण्यासाठी राणेंचे बुजगावणे पुढे केलं, विनायक राऊतांची भाजपवर टीका

शिवसेनेवर टीका करण्यासाटी राणेंचे बुजगावणे पुढे केलं, विनायक राऊतांची भाजपवर टीका

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांची जन आशीर्वाद यात्रा सुरु आहे. शिवसेना नेते आणि मंत्री एकनाथ शिंदे शिवसेनेत सहीपुरते मंत्री आहेत त्यांनी भाजपमध्ये यावं अशी खुली ऑफर नारायण राणेंनी दिली आहे. राणेंच्या वक्तव्यावर शिवसेना खासदार विनायक राऊत यांनी प्रत्युत्तर दिलंय, शिवसेनेवर टीका करण्यासाठी भाजपने नारायण राणेंचे बुजगावणे पुढे केलं आहे. बाडगा जो असतो तो कोडगा असतो असा घणाघात विनायक राऊत यांनी केला आहे. कोकणात येणाऱ्या जन आशीर्वाद यात्रेला शिवसेना गांभिर्याने घेत नाही. एकनाथ शिंदे शिवसेनेचा अभिमान असणारे मंत्री आहेत असं म्हणत विनायक राऊत यांनी शिंदेंचं कौतुक केलं आहे.

शिवसेना खासदार विनायक राऊत यांनी एका खासगी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या आरोपांवर प्रत्युत्तर दिलं आहे. नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर नारायण राणे यांनी आरोप केले आहेत. राणेंच्या वक्तव्यावर विनायक राऊतांनी म्हटलंय की, बाडगा असतो तो कोडगा असतो. भाजपने शिवसेनेवर टीका करण्यासाठी नारायण राणेंचे बुजगावणे पुढे केलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या आवाहनांना राणेंनी हरताळ फासले आहे. मोदींनी सांगितले होते जन आशीर्वाद यात्रेदरम्यान जनतेचे प्रश्न समजून घ्या पण नारायण राणेंनी जनतेचे किती प्रश्न जाणून घेतले? असा प्रश्न विनायक राऊत यांनी उपस्थित केला आहे.

राणेंवर टीकास्त्र

केंद्रीय मंत्री नारायण राणेंनी शिवसेनेशी बेईमानी केली आता इतर नेतेसुद्धा त्यांच्यासारखेच असल्याचे त्यांना वाटत आहे. यामुळे त्यांनी एकनाथ शिंदे यांच्यावर आरोप केला आहे. पण, एकनाथ शिंदे हाडाचे शिवसैनिक आहेत. आपल्या मंत्रीपदाला एकनाथ शिंदे न्याय देत पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी काम करत असल्याचे विनायक राऊत यांनी म्हटलं आहे. स्वतःच्या अनुभवानुसार इतरांचा मोजणे हा नारायण राणे यांचा गुणधर्म आहे. नारायण राणेंना ठोकम ठोकी करण्याची सवय आहे.

राणे कोकणात तिसरी लाट

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांची जनआशीर्वाद यात्रा सोमवारी रत्नागिरीत दाखल होत आहे. कोकणात राणे शक्तीप्रदर्शन करतील. मात्र नारायण राणेंची ही यात्रा कोकणात कोरोनाची तिसरी लाटेसाठी आमंत्रण ठरणार असल्याचा आरोप विनायक राऊत यांनी केला आहे. राणेंच्या जन आशीर्वाद यात्रेमुळे कोकणातील लोकांच्या जीवाला धोका निर्माण होऊ शकतो.


हेही वाचा : एकनाथ शिंदे फक्त सहीपुरते मंत्री, ते शिवसेनेला कंटाळले; राणेंचं मोठं वक्तव्य


 

First Published on: August 22, 2021 1:00 PM
Exit mobile version