मुंबईत येत्‍या ५ ऑगस्‍टपासून २० टक्‍के पाणीकपात

मुंबईत येत्‍या ५ ऑगस्‍टपासून २० टक्‍के पाणीकपात

मागील जून आणि जुलै महिन्‍यात मुंबईस पाणीपुरवठा करणाऱ्या तलाव क्षेत्रात सरासरीपेक्षा कमी पाऊस पडल्याने जुलै महिन्‍याच्‍या शेवटच्‍या आठवड्यात मुंबईस पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांमध्‍ये फक्‍त सुमारे ३४ टक्‍के जलसाठा उपलब्‍ध आहे. हा जलसाठा जुलै २०१९ मध्‍ये ८५.६८ टक्‍के व जुलै २०१८ मध्‍ये ८३.३० टक्‍के होता. हीच परिस्थिती यापुढेही राहिल्‍यास पावसाळा संपल्‍यानंतरसुद्धा महापालिकेकडे पुरेसा जलसाठा उपलब्‍ध होऊ शकणार नाही. मुंबईचा पाणीपुरवठा ३१ जुलै २०२१ पर्यंत सुरळीपणे चालू ठेवण्‍यासाठी पाणीपुरवठ्यात ५ ऑगस्‍ट २०२० पासून २० टक्‍के पाणीकपात करण्‍यात येणार आहे, अशी माहिती महापालिकेच्‍या जल अभियंता खात्‍याद्वारे देण्‍यात आली आहे.

पाणीकपात मुंबई महानगरपालिकेतर्फे पाणीपुरवठा केला जाणाऱ्या ठाणे, भिवंडी महानगरपालिका आणि इतर गावांनासुद्धा लागू राहील. तरी सर्व नागरिकांनी या कालावधीत पाण्‍याचा न्‍याय पद्धतीने वापर करुन प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन महापालिका प्रशासनातर्फे करण्‍यात येत आहे.

First Published on: July 31, 2020 8:13 PM
Exit mobile version