भिवंडीत अल्पवयीन मुलामुलींचे अपहरण

भिवंडीत अल्पवयीन मुलामुलींचे अपहरण

Abduction

भिवंडी शहर परिसरातून उपजत अल्पवयीन मुलामुलींच्या अपहरणाच्या घटना दिवसेंदिवस वाढत असतानाच दोन वेगवेगळ्या ठिकाणाहून एक 13 वर्षीय अल्पवयीन मुलगा व एक 17 वर्षीय मुलगी असे दोन अल्पवयीन मुला-मुलीचे अपहरण झाल्याच्या दोन घटना समोर आल्या आहेत. त्यामुळे परिसरातील पालक वर्ग कमालीचा धास्तावला आहे.

पहिल्या घटनेत कामतघर येथील राजीव नगरमध्ये राहणारा संतोषकुमार मुखीया (१३) बाहेर फिरून येतो असे सांगून 5 ऑगस्ट रोजी सकाळी 10 वाजता घरातून निघून गेला आहे. मात्र, तो तीन दिवस उलटूनही घरी परतला नाही. कुटुंबियांनी त्याचा परिसरात व नातेवाईकांकडे शोध घेण्यात आला. मात्र, तो सापडला नाही. त्यामुळे त्याचे अज्ञात व्यक्तीने फूस लावून अपहरण केले असावे, अशी भीती निर्माण झाल्याने वडील रमेश बैजनाथ मुखीया यांनी नारपोली पोलीस ठाण्यात मुलाच्या अपहरणाचा गुन्हा दाखल केला आहे. या अपहरणाच्या गुन्ह्याचा अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक नितीन चौधरी करीत आहे.

तर दुसर्‍या घटनेत मानसी बिल्डिंग, पद्मानगर येथे राहणारी जान्हवी मान सिंग (17) ही १२ वीत शिकत असून ती बुधवारी सकाळी 11 वाजेच्या सुमारास नेहमीप्रमाणे कॉलेजला गेली होती. मात्र, ती रात्री उशिरापर्यंत घरी परतली नाही. त्यामुळे तिचा नातेवाईक, मित्र, मैत्रिणींकडे शोध घेण्यात आला मात्र ती सापडली नाही. तिला अज्ञाताने पळवून नेले असावे अशी खात्री पटल्याने तिचे वडील मान भुपेंद्र सिंग यांनी शहर पोलीस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा दाखल केला आहे.

First Published on: August 9, 2019 1:17 AM
Exit mobile version