मधमाशीचा दंश; मुंबईत एकाचा मृत्यू

मधमाशीचा दंश; मुंबईत एकाचा मृत्यू

मधमाशीच्या दंशामुळे मृत्यू पावलेले गृहस्थ

बोरिवली येथील पालिकेच्या स्वातंत्र्यवीर सावरकर उद्यानात मधमाशांनी दंश केल्यामुळे एका व्यक्तीचा मृत्यू झाला असून दोन जण जखमी झाल्याची धक्कादायक घटना घडल्याचे समोर आले आहे. जखमींना स्थानिक खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून या घ़टनेने संपूर्ण परिसरात घबराट पसरली आहे. पंकज शहा (५४) याचा मृत्यू झाला असून रामनुज दाद (३२) आणि मेरितसा रमोना रोंगाव्हीला (४६) अशी यांना रुग्णांची नावे आहेत.

उद्यानात चावली मधमाशी

बोरिवली पश्चिम येथे लोकमान्य टिळक मार्गावर वीर सावरकर उद्यान आहे. या उद्यानात पंकज शहा, रामनुज दाद, आणि मेरितसा रमोना रोंगाव्हीला हे फिरण्यासाठी उद्यानात गेले होते. यावेळी यांना मधमाशांनी दंश केला. या व्यक्तींवर उपचार करण्यासाठी त्याला जवळील खाजगी रुग्णालयात दाखल केले होते. यामध्ये पंकज शहा (५४) यांचा मधमाशीने दंश केल्याने  मृत्यू झाला आहे. तर सध्या रामनुज दाद आणि मेरितसा रमोना यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार करण्यात आले. उपचारानंतर त्यांना घरी सोडण्यास आले असल्याची माहिती रुग्णालयाचे डॉ. सावंत यांनी दिली आहे.

अफवांना बळी पडू नका

बोरिवलीतल्या या घटनेनंतर सोशल मीडियावर अनेक मेसेज  फिरत आहेत. या उद्यानात जाऊ नका या संदर्भातले हे मेसेज असून अशा अफवांना बळी पडू नका. पण सध्या पावसाचे दिवस आहे, त्यामुळे मच्छर आणि माशींपासून सावधान!

मुंबईतली पहिलीच घटना

मधमाशी चावून एखाद्याचा मृत्यू होईल, असा विचार ही कोणाच्या मनात येणार नाही. पण मुंबईत पहिल्यांदाच मधमाशीमुळे एकाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.

First Published on: June 29, 2018 5:28 PM
Exit mobile version