मुंबईच्या विकास आराखड्याबाबत विधानसभेचे विरोधीपक्ष नेते राधाकृष्ण विखे – पाटील यांनी गंभीर आरोप केले आहेत. मुंबईचा विकास आराखडा हा बिल्डरांच्या फायद्यासाठी आहे. त्यामध्ये नियमबाह्य २५०० बदल केले गेले. पण, केवळ १४ बदल केल्याचं सांगितलं जात आहे. हे सारं खोटं आहे. असा आरोप विधानसभेचे विरोधीपक्ष नेते राधाकृष्ण विखे – पाटील यांनी केला आहे. मुंबईमध्ये पत्रकार परिषद घेत त्यांनी हा आरोप केला आहे.